शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST

धुळे जिल्ह्यात २१८ गामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आतापर्यंत ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून, आता फक्त १८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार ...

धुळे जिल्ह्यात २१८ गामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आतापर्यंत ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून, आता फक्त १८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यात १४७६ सदस्यांची निवड करायची आहे. निवडणुकीच्या रिंगणात तब्बल तीन हजार ३१९ उमेदवार असून, यात युवकांची संख्या साडेबाराशेच्यावर आहेत. म्हणजे एक तृतीयांशपेक्षा जास्त उमेदवार हे ३० वयोगटाच्या आतीलच असल्याचे चित्र आहे. मतदारांनी तरुणांच्या पारड्यात मते टाकून त्यांना विजयी केल्यास, आगामी पाच वर्षे गावाचे नेतृत्व युवकांच्या हाती येईल.

मार्च महिन्यात देशात लाॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, आदी मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त गेलेले तरुण आपल्या गावी परतले होते. आता ते गावातच वास्तव्यास आहे. त्यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने, त्यांना गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

तरुणांमध्ये निर्णय घेण्याची तसेच एखादी गोष्ट करून दाखविण्याची धमक असते. आजचा तरुण हा टेक्नोसेवी असल्याने तो तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. याचा फायदा लहान गावालाही होऊ शकतो. यामुळेच अनेक मातब्बरांनी तरुणांना निवडणुकीत पुढे केल्याचे चित्र आहे.

तरुणांनीही प्रचारात आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण काय करू शकतो याचाच प्रचार अधिक जोरोने सुरू केलेला आहे. यासाठी बॅनर, प्रसिद्धिपत्रक वाटण्याऐवजी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मतदारांनाही ते ‘अपील’ होत आहे. त्यामुळे गावाचे चित्र बदलू शकते, असा आशावाद आहे.

लहान निवडणुकांमधून आलेल्या अनुभवातूनच मोठे नेतृत्व घडू शकते. आज ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविणाऱ्या युवकाला भविष्यात मोठ्या निवडणुकांमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेक तरुणांनी यात हिरिरीने भाग घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत तरुणांचा राजकारणाकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जगात भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याची संधीसुद्धा युवकांच्या माध्यमातून मिळू शकते.