शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे यंदाही आरास नसल्याने विक्रेतेही फिरकले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST

जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या मानाने धुळे शहरात गणेशोत्सवाचा दरवर्षी अतिशय जल्लोष बघावयास मिळत असतो. शहरात मोठ्या सार्वजनिक मंडळांची संख्याही मोठी ...

जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या मानाने धुळे शहरात गणेशोत्सवाचा दरवर्षी अतिशय जल्लोष बघावयास मिळत असतो. शहरात मोठ्या सार्वजनिक मंडळांची संख्याही मोठी असून, यातील बहुतांश मंडळे ही सजीव देखावे व आरास सादर करीत असतात. स्थापनेच्या तीन-चार दिवसांनंतर भाविकही आरास बघण्यास घराबाहेर पडत असतात. सजीव आराशीचा देखावा हा साधारणत: १५ ते २० मिनिटांचा असतो. यातून विविध विषयांवर समाजप्रबोधन केले जाते. ही आरास बघण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. गर्दीमुळे गणेश मंडळ परिसरातील रस्ते गर्दीने रात्री उशिरापर्यंत फुलून गेलेले असतात. गणेशोत्सव म्हणजे छोट्या विक्रेत्यांसाठी व्यवसायाची पर्वणीच असते. मोठ्या मंडळांच्या लगतच पाणीपुरी, भेळ, चहा, याशिवाय विविध वस्तू विक्रीची दुकाने लावण्यात येत असतात. एकप्रकारे छोटेखानी यात्राच या मंडळांच्या परिसरात सायंकाळी सात ते १० या वेळेत भरलेली दिसून येत असते. भाविक आरास बघण्याबरोबरच ‘पोटपूजा’ही करीत असतात. तसेच लहान मुलांसाठी काही पालक खेळणी खरेदी करीत असतात. यातून किरकोळ विक्रेत्यांना किमान ५०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतचा व्यवसाय एका दिवसात होत असतो. पाच-सहा दिवसात या विक्रेत्यांना बऱ्यापैकी कमाई होत असते.

मात्र यावर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे किरकोळ वस्तू विक्रेत्यांवर मोठा परिणाम झालेला आहे. दोन-तीन महिने व्यवसायच नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात गणेशोत्सवात चांगला व्यवसाय होईल, पुन्हा सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा या विक्रेत्यांना होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने गणेशोत्सवासंबंधी बरेच निर्बंध घालून दिलेले आहेत. मूर्ती लहान, तसेच अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनेक मंडळांनी यावर्षी शासन नियमांचे पालन करून, आरास करण्याचे टाळलेले आहे. यावर्षी सजीवसह इतर कुठलीच आरास नसल्याने, भाविकही फारसे घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे गर्दीच नसल्याने, विक्रेत्यांनीही मंडळ परिसरात दुकाने लावण्याचे टाळलेले आहे. त्यामुळे या उत्सवातून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी फिरल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.