शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

पावतीप्रमाणे धान्य घ्या, न मिळाल्यास तक्रार करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST

धुळे : मे महिन्याचे संपूर्ण धान्य मोफत दिले जाणार आहे. लाभार्थ्यांनी पावतीप्रमाणे धान्य घ्यावे. दुकानदाराने पावतीप्रमाणे धान्य न दिल्यास ...

धुळे : मे महिन्याचे संपूर्ण धान्य मोफत दिले जाणार आहे. लाभार्थ्यांनी पावतीप्रमाणे धान्य घ्यावे. दुकानदाराने पावतीप्रमाणे धान्य न दिल्यास पुरवठा विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग जास्त प्रमाणावर वाढून रुग्णसंख्या वाढल्याने संपूर्ण देशभरात निर्बंध जारी केले आहेत. महाराष्ट्र शासनाने १४ एप्रिल ते १५ मेपर्यंत संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत गोरगरीब जनतेची अन्नधान्यावाचून उपासमार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने एप्रिल किंवा मे या एका महिन्यात मोफत अन्नधान्य देण्याचे जाहीर केले आहे. तसेच केंद्र शासनाने माहे मे व जूनमध्ये गतवर्षीप्रमाणे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभारर्थ्यांना मे महिन्यात धुळे जिल्ह्यात मोफत धान्य दिले जाणार आहे. तसेच मागील वर्षी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत शिल्लक असलेली डाळसुद्धा माहे मे मध्ये अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांना प्राधान्याने दिली जाणार आहे. अंत्योदय लाभार्थ्यांना वाटून शिल्लक राहिलेली डाळ ही प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना मोफत दिली जाणार आहे.

पंतप्रधान योजनेअंतर्गत केंद्र शासनाने मे व जूनसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य देण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ प्रति व्यक्ती मोफत दिले जाणार आहे. अंत्योदय कार्डला प्रति कार्ड एक किलो साखर वीस रुपये दराने नेहमीप्रमाणे दिली जाणार आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांचा अंगठा प्रमाणित करून ई-पाॅस मशीनवर धान्य वितरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. लाभार्थ्यांनी पावतीप्रमाणे मोफत धान्य प्राप्त करून घ्यावे. तसेच उपरोक्त नमूद प्रमाणे धान्य संबंधित स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध न झाल्यास संबधित तहसीलदार अथवा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यांनी केले आहे.