शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST

धुळे : चालकांसाठी प्रशिक्षण, गाड्यांची वेळोवेळी करण्यात येणारी दुरुस्ती, आगारांमध्ये नवीन गाड्यांचा समावेश यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे ...

धुळे : चालकांसाठी प्रशिक्षण, गाड्यांची वेळोवेळी करण्यात येणारी दुरुस्ती, आगारांमध्ये नवीन गाड्यांचा समावेश यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारात अपघातांमध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहेत. असे असले तरी अनेक प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सलाच प्राधान्य देत आहेत.

दुचाकी, चारचाकी, खासगी प्रवासी गाड्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. असे असले तरी अनेकजण एस.टी. महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. वाहनांच्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, त्याला एस.टी.ही अपवाद राहिलेली नाही. मात्र, इतर खासगी प्रवासी वाहनांच्या तुलनेत एस.टी.च्या अपघातांची संख्या कमी आहे.

स्पर्धेत टिकण्यासाठी एस.टी.तही आमूलाग्र बदल झालेले आहेत. मात्र, केवळ आरामदायी प्रवासामुळेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी बसनेच प्रवास करतात. शिवाय एस.टी. अनेक स्थानकावर थांबत असते. त्यामुळे वेळ भरपूर लागतो, तर ट्रॅव्हल्स ठरावीक ठिकाणीच थांबत असते. शिवाय स्वच्छतेच्या बाबतीत एस.टी.पेक्षा ट्रॅव्हल्स अधिक सरस असते. त्यामुळे तिकीट दर जास्त असले तरी अनेकजण ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. परंतु, अपघात झाल्यानंतर एस.टी.च्या प्रवाशाला जी तत्काळ मदत मिळते, ती ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्याला मिळत नाही.

एसटीला स्पीडलाॅक, ट्रॅव्हल्स मात्र सुसाट

एस.टी.ची गती जास्त वाटत असल्यास, एसटीला स्पीडलाॅक बसविण्यात येत असतो. त्यामुळे एसटीची गती मर्यादित ठेवण्यात येत असते. ट्रॅव्हल्सला गतीचे कुठलेही बंधन नसते. त्यामुळे एसटीच्या तुलनेत ट्रॅव्हल्स अतिशय सुसाट वेगाने धावताना दिसतात. धुळे आगारातील बसेसची नेहमीच गती तपासली जात असते.

अनुभवी चालक

बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. विमा योजना आहे. बसचा अपघात झाल्यास प्रवाशाला तत्काळ मदत दिली जाते. आजारावर होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती रक्कम प्रवाशाला दिली जाते. एस.टी. महामंडळाचे चालक हे प्रशिक्षणार्थी असतात. एकच चालक अनेक मार्गावर वाहन चालवीत असतो. त्यामुळे त्याचा रस्त्याचा अभ्यास झालेला असतो. त्याचा वाहन चालविण्याचा चांगला अनुभव असतो. इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एस.टी.चा प्रवास हा अतिशय सुरक्षित आहे.

- स्वाती पाटील,

आगार प्रमुख धुळे.

एस.टी.चा प्रवास सुरक्षित आहे. मात्र, एस.टी.मध्ये स्वच्छता नसते. ती अनेक ठिकाणी थांबत, थांबत जाते. यामुळे वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. आरामदायी प्रवासासाठी ट्रॅव्हल्सनेच प्रवास करतो.

- स्वप्निल कुळकर्णी

प्रवासी

एस.टी.ने प्रवास करणाऱ्या वृद्ध प्रवाशांना तिकीट दरात सवलत मिळत असते. खासगी बसमध्ये ही सुविधा मिळत नाही. शिवाय एस.टी. ग्रामीण भागात जाते, खासगी बस जात नाही. त्यामुळे एसटीनेच प्रवास करण्यास प्राधान्य देतो.

- शांताराम पाटील

प्रवासी