शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST

अतुल जोशी धुळे : गेल्या काही वर्षांपासून कपाशीखालोखाल सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या पिकाला भावही चांगला ...

अतुल जोशी

धुळे : गेल्या काही वर्षांपासून कपाशीखालोखाल सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या पिकाला भावही चांगला मिळतो. मात्र, सोयाबीनवर आलेल्या ‘मिली बग’मुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्याच्या स्वप्नांचा पुन्हा एकदा चुराडा झाला आहे.

अनियमित पाऊस, वातावरणातील बदलाचा शेतीला फटका बसू लागला आहे. पीक वाढू लागले की, त्यावर विविध कीडरोगांचाही प्रादुर्भाव होत असतो. यामुळे उत्पन्नात घट येते. तसेच शेतात उत्पन्न आले की, भावही घसरतात. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही.

सध्या कपाशीला चांगला भाव मिळतो. त्याखालोखाल आता सोयाबीनला भाव मिळू लागल्याने, शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल वाढलेला आहे. मात्र या पिकालाही आता ‘मिली बग’ने ग्रासलेले आहे.

काय आहे मिली बग?

मिली बग हा रस शोषण करणारा किडा आहे. तो कापूस, भेंडी, सोयाबीन आदी पिकांच्या कोवळ्या भागावर बसतो. त्याचा रस शोषत असतो. तसेच द्रव्य बाहेर टाकत असतो. पांढऱ्या रंगाचा हा किडा असून, त्यामुळे पिकांचे नुकसान होते.

मिली बग रोखण्यासाठी ही घ्यावी काळजी

n मिली बग रोखण्यासाठी एक टक्का साबणाच्या द्रावणाची फवारणी करावी. नंतर आंतरप्रवाही औषध फवारल्यास त्यामुळे ही कीड नियंत्रणात येते.

n हे कीड सर्व प्रथम बांधावर आढळून येत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेताचे बांध स्वच्छ केल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

पेरणीवर लावलेला पैसा निघतो की नाही?

सोयाबीनला भाव चांगला मिळतो. त्यामुळे त्याची लागवड केली. मात्र, या पिकावरही मिली बगचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने खर्च निघेल की नाही, याची शक्यता कमी वाटते.

-देविदास पाटील,

शेतकरी

कपाशीपाठोपाठ आता सोयाबीनला भाव मिळायला लागला आहे. परंतु आता या पिकालाही किडीने ग्रासलेले आहे. उत्पन्न कसे येईल, हे सांगता येत नाही.

-संजय पाटील

शेतकरी

मिली बगचा भाग कापावा

ज्या भागावर मिली बग आढळून येतो, तो भाग कात्रीने कापून टाकावा. तसेच कापून जमा झालेला कचरा जाळून टाकावा. म्हणजे मिली बगचा आणखी प्रादुर्भाव होऊ शकणार नाही. असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.