शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

कालवा दुरुस्तीने रब्बीला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 1:16 PM

अमरावती प्रकल्प : २ हजार ६०६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या दुरुस्ती व साफसफाई काम झाल्यामुळे याचा रब्बी हंगामातील बागायती क्षेत्र तसेच आगामी खरीप हंगामाच्या कापूस लागवडीसाठी चांगला फायदा होणार आहे.यामुळे दोन हजार ६०६ हेक्टर जमिनीला तसेच कालव्याला लागून असलेल्या विहिरींना देखील याचा लाभ होणार आहे.मालपुरसह सुराय, चुडाणे, दोंडाईचा तसेच अप्रत्यक्षपणे खर्दे, मांडळ, विखरण या गावांचा देखील आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच बागायती क्षेत्रात वाढ होईल. यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला गेल्याचे फलित असल्याने मालपूर, सुराय, विखरण येथील ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. उजवा कालवा १४ कि.मी. तर डावा कालवा सहा कि.मी. लांबीचा आहे. अनेक वर्षांपासून हे कालवे बंद असल्यामुळे गाळ तसेच काटेरी झुडपांमुळे हे कालवे पुर्णपणे नादुरुस्त होते. यामुळे धरणातील पाणी शेती तसेच शेत बांधापर्यंत पोहचत नव्हते. तसेच परिणामी विहिरीची देखील पाणी पातळी खालावत होती. यामुळे विहिरींना पाणी कायमस्वरूपी टिकून रहाणार आहे. पाटचाऱ्या तसेच कालव्याची दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांनी ‘लोकमत’मधून केली होती. त्यानुसार दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्णत्वास आले. तसेच कलवाडे फाटा जवळ कालवा खोलीकरण करवा यामुळे धरण बांधाजवळील पाझर कमी होणार आहे व तेथील शेतकºयांची शेती नुकसान देखील वाचणार आहे. ही मागणी मात्र शेतकºयांची कायम आहे. याकडे देखील लक्ष केंद्र्रित करावे, अशी मागणी केली आहे. सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे यासाठी काम केले. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे तरच यापाण्याचा फायदा यासाठी शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करावे असे येथील प्रकल्प अभियंता प्रशांत खैरनार यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे