शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
2
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
3
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
4
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
5
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
6
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
7
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
8
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
9
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
10
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
11
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
12
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
13
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
14
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
15
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
16
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
17
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
18
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
19
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
20
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
Daily Top 2Weekly Top 5

पेपर न तपासता बोर्डाला पाठविणार!

By admin | Updated: March 15, 2017 00:11 IST

धुळे : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे.

धुळे : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. शासनाने तत्काळ निर्णय घेतला नाही तर १६ तारखेपासून उत्तरपत्रिका न तपासता बोर्डाकडे पाठवण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने दिला आहे.चार वर्षांपासून पाठपुरावासंघटनेचा गेल्या चार वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तरी देखील अद्याप शासनाने शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. शासनाने मान्य केलेल्या मागण्यांबाबत एकही शासन आदेश पारित केला नाही. म्हणून शिक्षकांचे इयत्ता बारावीची रोज एकच उत्तरपत्रिका तपासणीचे आंदोलन सुरू आहे. मात्र, १६ तारखेपर्यंत शासनाने काहीच निर्णय घेतला नाही तर पूर्णत: असहकार आंदोलन पुकारून एकही उत्तरपत्रिका न तपासता सर्व उत्तरपत्रिका मंडळाकडे परत पाठविण्याचा विचार महासंघाच्या आदेशाने संघटना पातळीवर होणार आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत महासंघाच्या आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे. तरी मंत्र्यांनी आदेशित केलेले असतानाही शासन आदेश काढला जात नाही. यामुळे संघटनेचा शासनावरील विश्वास उडालेला आहे. म्हणून आदेश पारित होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिक्षकांच्या मागण्याकनिष्ठ महाविद्यालयीन मान्यता दिलेल्या शिक्षकांचे वेतन सुरू करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी. उपप्राचार्यांना वेतन मंजूर करावे. स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांना यापुढे परवानगी देऊ नये इत्यादी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यायीन संघटनेचे पदाधिकारी, परीक्षक, नियामक आदींसह शिक्षकांची बैठक झाली. यावेळी अध्यक्ष प्रा.बी.ए.पाटील, सचिव प्रा.डी.पी. पाटील, प्रा.एन.टी. ठाकरे, प्रा. एस. एन. पाटील, अतुल पाटील, प्रा. आर. जे. पवार, भागवत पाटील, नवनीत पाटील, एस.व्ही. टिळेकर, सुनील चौधरी, एन.व्ही. अहिरराव, भूषण पाटील, प्रा.संजय कुलकर्णी, प्रा.एम.एम. बुवा, जी.जी. वाणी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्षकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे स्वतंत्र प्रशासन असावे. सरसकट सर्वांना निवडश्रेणी देण्यात यावी. विद्यार्थी पटसंख्या शिथिल करण्यात यावी. एम्.फील, पीएच्.डीधारकांना अतिरिक्त वेतनवाढ देण्यात यावी. बारावी विज्ञान भाग १ व भाग २ पेपर पूर्वीप्रमाणे घेण्यात यावेत. कायम विनाअनुदानित शब्द काढून मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना २० टक्के अनुदान देण्यात यावे. २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांना मान्यता देण्यात याव्यात. सन २०११ पासून पायाभूत पदांना मान्यता देण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. बारावीच्या निकालाला होणार विलंबबारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचे २१ पेपर झाले आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू न केल्यामुळेच बारावीचा निकाल लागण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची विविध प्रवेश परीक्षांसाठी फॉर्म भरताना अडचण होणार आहे. एकाच शिक्षकाकडे एकापेक्षा जास्त विषय शिकवण्यासाठी असतात. त्यामुळे हा प्रश्न लवकर नाही मिटला तर शिक्षकांवर पेपर तपासणीचा ताण येणार आहे. गेल्या वर्षीही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला होता.