शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ठराविक लोकांच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कामांना केला विरोध : जि. प. सदस्य पोपटराव सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST

प्रश्न : जिल्हा परिषदेत सत्ताधारी गटाला केवळ विरोध म्हणून आपण हा प्रकार केल्याचा आरोप केला जात आहे? उत्तर : ...

प्रश्न : जिल्हा परिषदेत सत्ताधारी गटाला केवळ विरोध म्हणून आपण हा प्रकार केल्याचा आरोप केला जात आहे?

उत्तर : केवळ विरोध म्हणून आपण हे काम केलेले नाही. काही ठराविक व्यक्तीच्या फायद्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळेच्या विषयात करोडोची कामे बेकायदेशीरीत्या मंजूर करण्यास आपला विरोध होता. जिल्हा परिषदेच्या ३० एप्रिल २०२० मध्ये झालेल्या पहिल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळेच्या विषयात काही निविदा मंजुरी व प्रशासकीय मान्यतेचा विषय मांडले होते. आपण त्याचवेळी आर्थिक व धोरणात्मक विषय घेता येत नाही ते घेऊ नका असे सांगितले. त्यावेळी डेप्युटी सीईओ यांनीही नंतर ते मान्य केले. त्यावेळी माझा विरोध नोंदवूनही घेतला. परंतु दुसऱ्या बैठकीच्या प्रोसेडिंगमध्ये एक ते दीड कोटींचे टेंडर मंजूर आणि मान्यता दिल्याची नोंद होती. आपण त्यावेळेसही अशापद्धतीने बेकायदेशीररीत्या विषय मंजूर न करता ते अजेंड्यावर घ्या. तुमचे बहुमत आहे. चर्चा करून ते मंजूर करून घ्या, असे सांगितले, पण ऐकले नाही. यासंदर्भात आपण जि. प. अध्यक्ष व प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केली, पण आपले काहीही ऐकून घेतले नाही, म्हणून शेवटी आपल्याला मंत्र्यांकडे अपील करावे लागली.

प्रश्न - सर्वसाधारण सभेतही आपण विरोध केला तसेच विषय तहकूब ठेवण्याची मागणी केली होती.

उत्तर - जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा लॉकडाऊनच्या काळात ११ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांनी मला, जि.प.अध्यक्ष आणि सीईओ यांना बोलवून सभा घेऊ नका, असे सांगितले होते. परंतु अध्यक्षांनी आम्ही काळजी घेऊ आणि सभा लवकर संपवू, असे सांगितले. त्यानुसार बैठकीत अध्यक्षांनी आपल्याला बैठक दहा मिनिटांतच संपवायची आहे, असे सांगितले. तेव्हा मी, अजेंड्यावरील विषय वगळता आणखी काही विषय आहे का, असे विचारले होते. कारण अजेंड्यावरील ६ ते १३ विषयांवर मी आधीच हरकत घेतलेली आहे. अवघ्या २० मिनिटांच्या सभेत त्यांनी अजेंड्यावरील विषय आणि आयत्या वेळेचे सर्व विषयांना बेकायदेशीरीत्या मंजुरी दिली होती.

प्रश्न - आपण कोणकोणत्या विषयांवर हरकत घेतली होती.

उत्तर - आपण वर्षभरात झालेल्या स्थायी समितीच्या चार सभा आणि एका सर्वसाधारण सभेतील मंजूर करण्यात आलेल्या आयत्यावेळेचे आर्थिक व धोरणामत्मक विषयावर हरकत घेतली होती. यासंदर्भात आपण अपील केले होते. त्यावर ग्रामविकासमंत्र्यांकडे सुनावणी होऊन ते सर्व रद्द करण्याचा निर्णय झाला. शेवटी आपण जिल्हा परिषदेत बेकायदेशिररीत्या ठराविक लोकांच्या फायद्यासाठी सुरू असलेल्या कारभाराला विरोध केला, त्याला न्याय मिळाला आहे.