शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आता आषाढातही शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

शिरपूर : आषाढात साधारणत: शुभ कार्ये टाळली जातात. मात्र, कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत. अनेक दिवसांपासून कोरोनाच्या ...

शिरपूर : आषाढात साधारणत: शुभ कार्ये टाळली जातात. मात्र, कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत. अनेक दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नासाठी असलेले निर्बंध बघता काहींनी लग्न समोर ढकलले होते. परंतु, आता निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्याने मिळेल त्या मुहूर्तावर लग्न उरकून घेण्यावर भर दिला जात आहे.

कोरोनामुळे मागील वर्षापासून अनेकांनी आपले लग्न पुढे ढकलल्याचे दिसून येत होते. लग्न धूमधडाक्यात करण्यासाठी निर्बंध शिथिल होण्याची वाट पाहणारे आता आषाढमध्येही लग्न करण्यास समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने विवाह उरकण्याकडे वधू-वर पित्यांचा कल वाढला आहे. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला जातो. हिंदू धर्मात विवाह हे एक असे कार्य आहे, जे केवळ दोन लोकांमध्येच घडत नाही, तर दोन कुटुंबांना जोडते, म्हणूनच लग्नाशी संबंधित सर्व शुभ कार्ये शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस पाहून करतात. जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये म्हणून ग्रहांच्या स्थितीपासून या सर्वांचे मूल्यांकन केले जाते.

सध्या लग्नाचे मुहूर्त असल्याने दररोज लग्नसमारंभ उरकण्यात येतात. ना तिथी, ना कोरोनाची भीती अशा परिस्थितीत लग्नसमारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उद्रेक झाला. तालुक्यातील गावांपैकी असे एकही गाव शिल्लक नाही, ज्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसेल. धूमधडाक्यात लग्नसमारंभ पार पाडण्यात आले. डीजे, बँडच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करीत लग्न करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. परिणामी, गत जानेवारी ते मे महिन्यापर्यंत कोरोनाने उग्र रूप धारण केले होते. मात्र, गत महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या घटल्यामुळे सध्या शिरपूर तालुका कोरोनामुक्त झाला आहे. पूर्वी आषाढात लग्न करणे शुभ समजले जात नव्हते. मात्र, आता आषाढातही लग्न लावले जात आहे. या महिन्यातही शुभ तारखा आहेत. शुभ मुहूर्त म्हणजे ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूल स्थिती. विवाहामध्ये शुभ मुहूर्तावर विशेष काळजी घेतली जाते.

- जयेश जोशी,

पंडित

कोरोनामुळे यावर्षी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पडले आहेत. आता आषाढातही शुभ मुहूर्त असल्याने, अनेकांनी विवाह समारंभाचे आयोजन केले आहे. आषाढात केलेले विवाहदेखील शुभ असतात. त्यामुळे या महिन्यात प्राधान्य दिले जाते.

योगेश दीक्षित

पंडित

राज्य शासनाने कोविड-१९ च्या अनुषंगाने डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे काही निर्बंध लागू करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात तिसऱ्या श्रेणीतील निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यानुसार लग्न समारंभात बँड पथक, कॅटरिंग, आदींसह पूर्व परवानगीने कोविड नियमांचे पालन करून ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मात्र, त्या नियमांचे पालन पाहिजे तसे शिरपुरात होत नाही.

मंगल कार्यालये बुक

n आषाढातील मुहूर्तावरही लग्न समारंभासाठी मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत.

n कोरोनामुळे मंगल कार्यालय चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मंगल कार्यालयांना विवाह समारंभासाठी तारखा मिळत नसल्याचे चित्र आहे.