शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या लुटीची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 22:53 IST

अनिल गोटे : पत्रकार परिषदेत केला आरोप

धुळे : केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा आणला असून, हा शेतकऱ्यांच्या लुटीची व्यूहरचना आहे. एक वर्षांपूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये या सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या २०१ अटीपैंकी २०० अटी आम्ही स्वीकारल्याचे म्हटले आहे. त्याचे दर्शन, लवलेशदेखील या आणलेल्या तीनही कायद्यांमध्ये नाही. अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, त्यांनी विरोधकांवर आगपाखडदेखील केली.अनिल गोटे म्हणाले, सेना आणि हवाईदलातील सेवानिवृत्तीनंतर शेती करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोदी-शहांचा कायदा कळालेला नाही. देशाचे दुर्दैव आहे की सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जात आहे. राजधानीच्या सीमेवर दीड कोटी शेतकरी एक लक्ष वीस हजार ट्रॅक्टर घेून रक्त गोठवणाऱ्या थंडीत जीवाची पर्वा न करता आंदोलन करीत आहेत.आज त्यांचा ३२वा दिवस आहे. रक्त गोठवणाऱ्या जीवघेण्या थंडीत कष्टाने पिकविलेल्या शेती उत्पादनास रास्त भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहे. त्यांच्यावर निदर्यतेने थंडगार पाणी फवारले जात आहे. मोदी-शहा सरकारचे शेतकऱ्यांना त्यांच्या निश्चयापासून विचलित करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. जगाच्या अन्नदात्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी, चिनी आतंकवादी संबोधले, हे कुठल्याही सुसंस्कृत नागरिकास शोभा देणारे नाही.आंदोलक शेतकऱ्यांमागे चीन आणि पाकिस्तान असल्याचे संतापजनक वक्तव्य केल्याने राज्यात गणपत पाटलानंतर रावसाहेब दानवे यांच्याइतका विनोदी, विदुषक दुसरा कोणीच नाही. नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा हे देशाच्या सर्वोच्च पदावर बसून करतात तरी काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ आपल्या मालकांना खुश करण्याकरीता भाजपचे पाळीव पोपट हे एकाचवेळेस पोपटपंची करीत सुटले आहेत. नेमका आणलेला हा नवीन कायदा नेमका आहे तरी काय, हे सोप्या आणि सुटसुटीत भाषेत देशातल्या शेतकऱ्यांना आजवर कोणीही समजून सांगितलेला नाही.कोरडवाहू किंवा चारमाही बागायत करणाऱ्या शेतकऱ्याचे कांदा हे एकमेव मनीक्रॉप आहे. शेतकऱ्याला चार पैसे मिळू लागताच कांद्यावर निर्यातबंदी करून कांद्याचे भाव पाडले. देशातील भाजप सरकारने जगासमोर नामुष्कीची वेळ आणली आहे, अशी टीका गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

टॅग्स :Dhuleधुळे