शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ८१ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST

यावर्षी हवामान विभागाने सरासरीएवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यानंतरही मृगासोबत आर्द्रा नक्षत्रही कोरडेच गेले. मात्र, पाऊस पडेल, या आशेवर ...

यावर्षी हवामान विभागाने सरासरीएवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यानंतरही मृगासोबत आर्द्रा नक्षत्रही कोरडेच गेले. मात्र, पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली होती.

धुळे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख १६ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चत करण्यात आले हाेते. त्यापैकी १९ जुलैपर्यंत ३ लाख ३६ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. एकूण पेरणीची टक्केवारी ८०.७५ टक्के इतकी आहे. जूनच्या सुरुवातीला पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यानंतर पंधरा दिवस विश्रांती घेऊन पुन्हा हजेरी लावली हाेती. पहिला पाऊस वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या. मात्र, नंतर पावसाने दांडी मारली. त्यामुळे नंतरच्या पावसानंतरच शेतकऱ्यांकडून पेरणी करण्यात आली. तसेच काही शेतकऱ्यांकडे बागायतीची साेय असल्याने त्यांनी कमी पावसातही पेरणी करून टाकली. तीन नक्षत्र काेरडी गेली. तर मंगळवारपासून नवीन नक्षत्र सुरू झाले. या नक्षत्राचे वाहन घाेडा असल्याने व राज्यात सर्वदूर पाऊस पडत असल्याने चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

धुळे तालुका आघाडीवर

जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा धुळे तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे तालुक्यात पेरणीचे प्रमाणही जास्त आहे. तालुक्यात १ लाख ७ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ९३ हजार ७३० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. पेरणीची एकूण टक्केवारी ८६.९५ टक्के आहे.

त्याखालोखाल शिंदखेडा तालुक्यात पेरणी झालेली आहे. या तालुक्यात १ लाख ७३२ हेक्टर उद्दिष्टापैकी ८१ हजार ४४१ हेक्टरवर म्हणजेच ८०.८५ टक्के पेरणी झालेली आहे. शिरपूर तालुक्यात १ लाख ६ हजार ५९६ हेक्टरपैकी ८५ हजार ९ हेक्टर म्हणजेच ७९.७५ टक्के पेरणी झाली. दरवर्षी सर्वाधिक पाऊस हाेणाऱ्या साक्री तालुक्यात अद्याप चांगला पाऊस नसल्याने तालुक्यात सर्वांत कमी पेरणी झाली आहे. साक्री तालुक्यात १ लाख १ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चत केले हाेते. त्यापैकी केवळ ७६ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे केवळ ७५.१५ टक्केच पेरणी झाली आहे. अजून पंधरा दिवसात चारही तालुक्यात दमदार पाऊस न झाल्यास पेरणी केलेल्या पिकांना धाेका निर्माण हाेऊ शकताे.