शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार वाळू उपशाने नद्यांचे अस्तित्व धोक्यात, रात्रंदिवस वाहनांचा राबता : कारवाई होते पण वचक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST

पांझरा नदीतही धुळे शहरातील पात्रासह ग्रामीण भागात खेडे, कुसूंबा, नेर आदी ठिकाणच्या पात्रांमध्ये रात्रभर वाळू उपसा चालतो. नदीकाठच्या झाडाझुडपांमध्ये ...

पांझरा नदीतही धुळे शहरातील पात्रासह ग्रामीण भागात खेडे, कुसूंबा, नेर आदी ठिकाणच्या पात्रांमध्ये रात्रभर वाळू उपसा चालतो. नदीकाठच्या झाडाझुडपांमध्ये वाळूचे ढीग लावले जातात. त्यानंतर गाड्यांमध्ये भरून त्याची वाहतूक केली जाते. एकीकडे घरकुल योजनांसाठी वाळू ठेक्यांचा लिलाव देण्याचा विचार शासन करीत असताना शहरांमध्ये मोठमोठी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना वाळू येते कुठून असा प्रश्न पर्यावरणवादी उपस्थित करीत आहेत.

बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलदेखील बुडतो आहे. वाळू उपशामुळे नद्यांचे पात्र खोल आणि रुंद झाले आहे. नैसर्गिक रचना बदलल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात येत आहे.

अवैध वाळू उपसा आणि वाळू वाहतुकीच्या विरोधात महसूल विभाग कारवाई करीत आहे. जिल्हास्तरीय गाैण खनिज पथकाची कामगिरीही चांगली आहे. वाहने पकडून दंड ठोठावला जातो; परंतु वाळू माफियांवर प्रशासनाचा वचक नसल्याने वाळू उपसा सुरूच आहे.

पात्र रुंदावल्याचा फटका

अनियंत्रित वाळू उपशामुळे तापीचे पात्र अतिशय खोल आणि रुंद झाले आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाळू नसल्याने नदीत पाणी थांबत नाही. शेतीसाठी आणि पिण्यासाठीदेखील पाणी शिल्लक राहणार नाही, तसेच तापीकाठच्या गावांना पुराचा फटका बसू शकतो. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने जैवविविधता धोक्यात आली आहे. प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी.

दररोज होणारा वाळू उपसा

वाळू घाटांचा लिलाव होऊन परवानगी देताना साडेचार फुटापेक्षा अधिक खड्डा करता येत नाही; परंतु सध्या परवानगीच नाही तरीदेखील नदी पात्राला मोठे भगदाड पाडले जात आहे. नदीपात्र पोखरुन निघाले. धुळ्यासह नाशिक, ठाणे, मुंबई अशा शहरांमध्ये तापीच्या वाळूला मोठी मागणी आहे. त्यामुळे दररोज हजारो ब्रास वाळू उपसा सुरू आहे. अहोरात्र उपसा आणि वाहतूक सुरू आहे.

वाळू तयार होण्यास १०० वर्षे लागतात. अशाच पद्धतीने वाळू उपसा सुरू राहिला तर वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्याचा एक थेंबही उरणार नाही. प्रशासनाने वाळू माफियांचा बंदोबस्त करावा, तसेच शासनाने देखील वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, अशी निसर्गमित्र समितीची मागणी आहे. पर्यावरणासाठी नद्यांमध्ये वाळू आवश्यक आहे.

- प्रेमकुमार अहिरे, पर्यावरण मित्र.