शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

निधी उशिरा मिळाल्याने गणवेश खरेदीला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST

गणवेश खरेदीत राजकारण नाही - मुख्याध्यापक संघटना धुळे - जिल्हा परिषद शाळेच्या विध्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश दिला ...

गणवेश खरेदीत राजकारण नाही - मुख्याध्यापक संघटना

धुळे - जिल्हा परिषद शाळेच्या विध्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश दिला जातो. गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीचे असतात. बऱ्याचदा गणवेश खरेदीवरून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमध्ये राजकारण होते आणि विध्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास उशीर होतो. मात्र जिल्ह्यात गणवेश खरेदीत राजकारण्यांची कोणतीही लुडबुड नसल्याचे मुख्याध्यापक संघाचे म्हणणे आहे. निधी उशिरा प्राप्त झाल्यामुळे गणवेश वाटपाला उशीर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

प्रत्येकवर्षी जून महिन्यात गणवेश खरेदीसाठी निधी प्राप्त होतो. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीची बैठक होऊन गणवेश खरेदी केली जाते व विध्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जातात. यंदा मात्र मार्च महिना उजाडला तरी विध्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झालेले नाहीत. गणवेश खरेदीसाठी फेब्रुवारी महिन्यात निधी मिळाला. निधी उशिरा मिळाल्यामुळे गणवेश खरेदी उशिरा झाली असल्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष साहेबराव गिरासे यांनी सांगितले. तर गणवेश खरेदी कोणत्याही प्रकारचे राजकारण होत नसल्याचे शिक्षण सभापती मंगला पाटील यांचे म्हणणे आहे. निधी लवकर मिळाला असता तर विद्यार्थ्यांना लवकर गणवेश वाटप करता आले असते असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया -

फेब्रुवारी महिन्यात गणवेश खरेदीसाठी निधी प्राप्त झाला. काही विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप केले आहेत. गणवेश खरेदीत कोणतेही राजकारण नाही. निधी उशिरा आल्यामुळे अडचणी निर्मण झाल्या होत्या.

- साहेबराव गिरासे, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ

गणवेश खरेदीत राजकारणाचा कोणताही विषय नाही. निधी उशिरा मिळाल्याने गणवेश खरेदी रखडली होती. आता प्रत्येक शाळेला निधी मिळाला आहे. ५० टक्के शाळांचे गणवेशाचे वाटप देखील पूर्ण झाले आहे.

- मंगल पाटील, शिक्षण सभापती

मुख्याध्यापकांच्या मागण्या काय -

१ - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएल धारक मुलांना गणवेश मिळतो. मात्र खुला व इतर मागास प्रवर्गातील मुलांना गणवेश मिळत नाही. सर्व मुलांना गणवेश देण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.

२ - प्रत्येक वर्षी जून महिन्यात गणवेश निधी मिळतो. यंदा मात्र आठ महिने उशिरा निधी मिळालेला आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात जून महिन्यातच निधी मिळावा. जास्त उशीर होऊ नये.

३ - एका गणवेशासाठी शासनाकडून ३०० रुपये दिली जातात. मात्र ३०० रुपयांमध्ये चांगल्या दर्जाचा गणवेश उपलब्ध होत नाही. म्हणून गणवेश निधीत वाढ करावा अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे.

४ - प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळतात. यंदा मात्र कोरोनाचा फटका गणवेश निधीलाही बसला असून एकच गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र पुढील शैक्षणिक वर्षांपासून दोन गणवेश मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.