शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दोन वेचणीत संपणार कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:48 IST

फरदडची आशाही मावळली : अवकाळी पावसाने फुलफुगडी झटकली, कैऱ्या सडल्या

विंचूर : धुळे तालुक्यात यंदा संततधार पावसाने बाजरी, ज्वारी, मका ही पिके चाºयासह सडून गेली आहेत. तर बहुतांश कापूसही अवघ्या दोनच वेचणीत संपेल, असे विदारक चित्र तालुक्यातील शिरुड, जुनवणेसह जिल्ह्यातील बहुतांश शिवारात आहे.यंदा खरीपात सततच्या पावसाने दसरा सणानंतर आठवडाभर विश्रांती घेतली. मात्र कापसाची आधीची फुलफुगडी गळून पडली. आधी लागवड झालेल्या कपाशीच्या पक्कया कैºया सडल्या, अशी कैफियत कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली. यातच आठवडाभरात उन्हाने कपाशी बहरायला पुन्हा प्रारंभ झाला. तोच दिवाळीच्या सुमारास सलग १० दिवस मध्यम ते जोरदार तसेच भिज पावसाने या पिकाचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडांची पाने पिवळी पडली, नव्याने आलेली फुलेही बरीचशी झटकून जमिनीवरच पडून सडली. जेमतेम दोन चार कैºया लागलेल्या आहेत. जास्त पाणी साठल्याने त्यामुळे पानांचा रंग पिवळा पडल्याने पुन्हा बहर येणे शक्य वाटत नाही, असे कृषी सहायक पी.ई. लांबोळे यांनी आर्वी, बेंद्रेपाडा येथील पाहणीवेळी सांगितले. दिवाळीनंतर चार ते पाच महिने वेचला जाणारा कापूस पुढील १५ दिवसांत फक्त दोनच वेचणीत संपेल, अशी परिस्थिती आहे. शेतकºयास रोख रक्कम मिळवून देणारे पांढरे सोने चिखलात दडल्याने उत्पन्न लक्षणीय घटणार असल्याचे यातून स्पष्ट होते. मुलांचे शिक्षण, विवाह समारंभ, वृद्ध आईवडिलांवरील उपचार आदी बाबी पूर्ण होणे तर दूर; पण गेल्या तीन वर्षांपासून होणाºया अत्यल्प उत्पन्नाने शेतकरी व मजुरांचे रोजचे जीवन अवघड बनले आहे.धुळे तालुक्यातील शेतकºयांच्या कोरडवाहू व बागायती शेतातील खरीप हंगामात बाजरी, ज्वारी, मका याप्रमाणेच विशेषत: मध्यम ते हलक्या जमिनीतील कापूस पिकाची मोठी हानी झाल्याने शेतकरी हतबल ठरला आहे. शासनामार्फत तातडीने आर्थिक मदत व कर्जमुक्ती ही अपेक्षित आहे. याबाबत पीकविमा धारक शेतकºयांंनी नुकसानीबाबत सूचना अर्ज विमा कंपनीला शासनामार्फत द्यावा की नाही, या संदर्भात शिरुड, निमगुळसह परिसरातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत. सध्या कपाशीबाबत नुकसान अर्ज देण्याचा कुठल्याही सूचना नाहीत. कारण कापूस वेचणीबाबत कृषी, महसूल विभाग व विमा कंपनी आदींचा पीक काढणी प्रयोग, उंबरठा उत्पन्नाचा अंदाज घेतल्यानंतर नुकसानबाबत आढावा घेतला जातो, असे कृषी सहायक सुमित नगराळे यांनी सांगितले. सध्या अनेकांचा कापूस वेचणीवर आला असून त्यात चक्रीवादळाच्या बातम्यांमुळे पाऊस पुन्हा आला तर काय? ह्या भीतीने एकाचवेळी सर्वांना वेचणीसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे प्रत्येकी मजुरीचा दरही ५० ते ७० रुपयांनी वाढली, असे शेतकरी कृष्णा बाबूलाल देसले, विनायक देवरे गणेश बोरसे, दिलीप खिवसरा यांनी सांगितले. कपाशीखालील क्षेत्रही नेहमीच अधिक असते. परतीच्या पावसाने या पांढºया सोन्याची हिरवी पाने पिवळी झटकली, वाढ खुंटली, बहर खाली गळून पडला. त्यामुळे फरदड घेता येण्याची शक्यता दिसत नाही. उलट पुढील दोन वेचणीत संपूर्ण कपाशी पीक संपण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्ग रडकुंडीला आला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे