शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या त्या कोरोना योध्दांवरच भ्रष्टाचाराचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात गुरूवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती संजय जाधव, सहायक आयुक्त शिल्पा नाईक, ...

महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात गुरूवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती संजय जाधव, सहायक आयुक्त शिल्पा नाईक, नगरसचिव मनोज वाघ आदीसह सदस्य उपस्थित होते. स्थायी समितीच्या सभेत सहा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी एकही विषय धुळेकरांच्या हितासाठी किंवा काेरोना काळातील उपाय योजना संदर्भात नसल्याने नगरसेवक शितल नवले यांनी आक्षेप घेत म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कंटेनमेंट झाेन तयार करण्यात आले होते. त्यासाठी मनपाने स्थानिक वृतपत्रात जाहिरात न प्रसिध्द करता परस्पर मनपाच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी धनलक्ष्मी ठेकेदारास ठेका दिला होतो. सदरील ठेकेदाराने शहरातील ४०० कंटेनमेंट झाेनसाठी तब्बल ९५ लाखांचे भाडे मनपाकडून मागितले आहे. वास्तविक बहुसंख्य रस्ते १२ मीटरचे असताना सरसकट ४० मीटरचे रस्ते दाखवून तर अव्वाच्या सव्वा बिल काढले जात आहे. शहरातील काही गल्ल्यामध्ये चारचाकी गाडी देखील जाऊ शकत नाही. अशाही गल्ल्या ४० मीटरच्या दाखविण्यात आल्या आहेत.

कोरोना काळात भाजपा एकमेव पक्ष होता की, जो रस्त्यावर उतरून कोरोना बाधितांची मदत करत होता. जिल्हाध्यक्ष, महापाेैर यांच्यासह सर्वच पदाधिकारी अन्नदान करण्याचे काम करीत असतांना मनपाचे अधिकारी पैसे कमविण्यामागे लागले होते. असा ही आरोप शितल नवले यांनी सभेत केला.

यावेळी खुलासा देताना उपायुक्त शांताराम गोसावी म्हणाले की, काेरोना काळात शासनाकडून तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी शहरातील मंडपदारांची बैठक मनपात घेण्यात आली. याेग्य दर असल्याने तसा निर्णय घेण्यात आला. कोरोना काळ किती दिवसांसाठी असेल किंवा नाही. याबाबत माहिती नसल्याने मनपाला बांबू विकत घ्यावे, किंवा नाही याबाबत निर्णय घेता आला नाही. वाढीव बिलासंदर्भात सदस्यांचा आक्षेप असेल तर सभापतींना अधिकार असल्याने त्यांनी तसा निर्णय घेऊ शकतात. असेही गाेसावी यांनी सांगितले.

कोरोनासाठी औषधी नाही.

मनपाकडे पुरेसा बेड तसेच वैद्यकीय पथक असतांना केवळ बाधितांवर उपचार करण्यासाठी औषधी उपलब्ध नसल्याने रूग्णांची गैरसाेय होते. गैरसाेय टाळण्याठी उपाय याेजना करण्याची मागणी अमिन पटेल यांनी केली.

घंटागाडी, पाणीटंचाईसह असच्छतेवर सदस्य नाराज

प्रभागात नियमित घंटागाडी येत नाही. तर महिनाभरात केवळ ३ वेळा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामाेरे जावे लागते असल्याची तक्रार नगरसेवक अमोल मासुळे, भारती माळी, किरण कुलेवार,कमलेश देवरे, हिना पठाण आदींनी केली.