शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या विमुक्तांची स्वतंत्र जनगणना करा : आ. संजय राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST

धुळे : भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. संजय राठोड ...

धुळे : भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. संजय राठोड यांनी केली आहे. ते येथील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भटक्या विमुक्त प्रवर्गातील नागरिक मागास व असंघटित आहेत. त्यामुळे ते आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरू शकत नाहीत. बंजारा, नाथजीगी, नंदीवाले अशा जातींचा समावेश या प्रवर्गात होतो. दोन वेळच्या जेवणासाठी त्यांचा संघर्ष सुरू असतो. महाराष्ट्रात स्थापना झालेल्या रेणके व बापट आयोगानेदेखील हा समूह मागास असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भटक्या विमुक्त जातींचे सर्वेक्षण होऊन स्वतंत्र जनगणना करण्यात यावी याबाबत विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे आ. राठोड यांनी सांगितले.

भाजपचे आंदोलन कुणाच्या विरोधात?

आ. राठोड यांनी या वेळी भाजपने केलेल्या चक्काजाम आंदोलनावरही टीका केली. ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळायलाच हवे. ओबीसी आरक्षणाला पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला इंपिरिअल डाटा हा केंद्र शासनाकडे आहे. त्यांनी तो डाटा दिला तरच ओबीसी आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे भाजप कुणाच्या विरोधात आंदोलन करत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.