शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या ६८४ कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यामुळे रिक्त झालेल्या १५ गट आणि ३० गणांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर ...

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यामुळे रिक्त झालेल्या १५ गट आणि ३० गणांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यापूर्वीच सततच्या निवडणूक आणि कोरोनाच्या संकटामुळे जिल्हा परिषदेच्या विकासकामांना खीळ बसलेली होती. त्यात आता कामांना गती येणार असतानाच आचारसंहितेमुळे पुन्हा कामाचा खोळंबा झाला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागवगळता, बांधकाम, लघुसिंचन, शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण, ग्रामपंचायत अशा सर्वच विभागाच्या दीडशे कोटी रुपयांचे तब्बल ६८४ कामे ठप्प झाली आहेत. आता ही कामे पूर्ववत सुरू होण्यासाठी निवडणूक संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यात लघुसिंचन विभागाचे २२ कोटी रुपयांचे २४० कामांसाठी ९८ निविदा प्रस्तावित होत्या. मात्र आता एक महिन्यापर्यंत या निविदाच उघडल्या जाणार नाहीत, तर तीन ग्रामपंचायतीची बांधकामेदेखील निविदा स्तरावर अडकली आहेत. साधारण ५० लाख रुपयांचाही कामे आहेत, तर पशुसंवर्धन विभागाचे सहा कामे, शिक्षण विभागातील शाळाखोली बांधकामाचे १६ कामे कार्यादेश स्तरावर अडकली आहेत. आरोग्य विभागाच्या नऊ उपकेंद्रांचे आणि तीन आरोग्य केंद्राची कामे निविदा स्तरावर अडकली आहेत. सर्वाधिक फटका हा बांधकाम विभागाला बसला आहे. बांधकाम विभागांतर्गत मूलभूत सुविधांतर्गत १२५ रस्ता कामे, ३०-५४च्या हेड खालील २५५ विकासकामे तसेच इतर रस्ता कामे ३० असे ४१० कामे आचारसंहितेमुळे रखडली आहेत. पूर्वकल्पना नसताना अचानक आचारसंहिता लागू करण्यात आल्यामुळे कामांचा खोळंबा झाला आहे.