शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

७ लाख ९७ हजार बालकांना मिळणार जंतनाशकाची गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 5:09 AM

धुळे जिल्ह्यात १ मार्च रोजी राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार ...

धुळे जिल्ह्यात १ मार्च रोजी राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. या मोहिमेची ग्रामीण व शहरी भागात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३२ उपकेंद्र, २ उपजिल्हा रुग्णालय, १३ मनपाचे दवाखाने, २,२४६ अंगणवाडी, १,८४८ शासकीय व खासगी शाळांमार्फत गाेळ्यांचे वाटप केले जाणार आहे.

देशात ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतांमुळे होतो. देशात २८ टक्के बालकांना कृमीदोष होण्याची शक्यता असते. त्याची प्रमुख कारणे म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे आहे. या कृमी दोषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमी दोष हा व्यापक स्वरूपाचा असून, मुलांना कमकुवत करणारा आहे. कृमी दोष हा रक्ताक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे, शिवाय बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. देशात ६ ते ५९ महिने वयोगटांतील प्रत्येकी दहा बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्ताक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्तही असू शकते, तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटांतील किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्ताक्षय आढळतो.

देशात पाच वर्षांखालील सुमारे ५० टक्के बालके वाढ खुंटलेली आहेत. साधारणतः ४३ टक्के बालके कमी वजनाची आहेत. राष्ट्रीय जंतनाशकाचा उद्देश १ ते १९ वर्षे वयोगटांतील सर्व पूर्व शालेय वयोगटांतील मुलांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी १ मार्च, २०२१ व ८ मार्च, २०२१ रोजी करण्यात येणार आहे.

तालुकास्तरावर मोहिमेंतर्गत शाळेतील नोडल शिक्षकांना शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांनी आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य पर्यवेक्षक व इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे. १ मार्च रोजी जिल्ह्यातील ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानीत शाळा, खासगी शाळा, तसेच अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा येथे जेवणानंतर जंतनाशक गोळीचा लाभ देण्यात येणार आहे. गोळी ही जेवण करूनच घ्यावी. या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबर शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागाचा सहभाग आहे. या दिवशी जंतनाशक गोळी दिली गेली नाही, तर अशा बालकांना ८ मार्च रोजी मॉप-अप दिनी जेवणानंतर ही गोळी देण्यात येणार आहे.

या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नवले, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.शिवचंद्र सांगळे यांनी केले आहे.