शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

जुलमी रोहिले, पठाणांना मारून भगवानसिंग दादांनी गावातील विहीर भरली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST

उमरगा तालुक्यातील मुरूममधील स्वातंत्र्यसैनिक भाई भगवानसिंग (दादा) यांच्या काही आठवणी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासात आहेत. भगवानदादांचा जन्म १४ ऑगस्ट १९२२ ...

उमरगा तालुक्यातील मुरूममधील स्वातंत्र्यसैनिक भाई भगवानसिंग (दादा) यांच्या काही आठवणी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासात आहेत. भगवानदादांचा जन्म १४ ऑगस्ट १९२२ रोजी मुरूम येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण सोलापूर येथे चालू केले. शालेय जीवनापासूनच अन्यायाची व जुलमी राजवटीची चीड त्यांच्या मनात होती. यातूनच थोर सेनानी स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांच्या सहवासाने अग्नी भडकत गेला आणि संग्रामाच्या मशाली पेटू लागल्या. त्यांनी सोलापूरला एका जुलमी इंग्रज अधिकाऱ्याचा खात्मा वयाच्या १८ व्या वर्षी केला. त्यामुळे काॅलेजमधून त्यांचे निलंबन झाले. यानंतर त्यांनी भूमिगत राहून कारवाया केल्या. या काळात अनेक देशभक्तांचा सहवास व प्रेरणा मिळाली. यातून देशभरातील क्रांतिकारकांच्या चळवळीने व बलिदानाने देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; परंतु, मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीत यातना भोगत होता. याच काळात भाई भगवानसिंग भूमिगत चळवळ संपवून पुन्हा सक्रिय झाले. संग्रामाची आखणी होऊ लागली. १ ऑक्टोबर १९४७ रोजी हा संघर्ष सुरू झाला. गुलबर्गा जिल्ह्यातील सरसंबा (ता. आळंद) येथील करोडगिरी नाक्याची धूळधाण केली. केसरजवळगा येथे कॅम्प संघटन केले. जामगा येथे नाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून करोडगिरी व जामगा येथील सर्व रेकाॅर्ड जाळून टाकले. यावेळी तब्बल सहा तास फायरिंग चालली. त्यात त्यांनी अलीशरे नावाच्या सैनिकाला यमसदनास पाठवले. त्यामुळे बाकीचे सैनिक शस्त्रे टाकून पळाले. हीच शस्त्रे व दारूगोळा वागदरी व घोळसगाव येथील कॅम्पप्रमुखांना देण्यात आला. यातूनच सशस्त्र क्रांती सुरू झाली.

जानेवारी १९४८ ला लेव्ही प्रतिबंध व अनेक केंद्रांवर हल्ला करून लूटमार केली. मार्च १९४८ मध्ये अनेक रझाकार केंद्रे, निजामी पोलीस पार्टी, जुलमी रोहिले व पठाण यांच्यावर सशस्त्र हल्ले करून त्यांनी जेरीस आणले. अनेक पोलीस ठाण्यांवर हल्ले करून रसद जमा केली. अनेक तरुणांना शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तलवार, रायफल, पिस्तूल व बाॅम्बगोळ्यांचे प्रशिक्षण देण्याचे काम स्वत: दादा करीत होते. अनेक संकटांचा सामना करत त्यांनी धैर्याने झुंज दिली. जनतेचा क्षोभ पाहून १७ सप्टेंबर १९५८ रोजी मराठवाडा मुक्त झाला. या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन व भारत सरकारतर्फे भगवानसिंग गहेरवार यांचा यथोचित सन्मान झाला. तत्कालीन पंतप्रधानांच्या वतीने ताम्रपदक व सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मानदेखील करण्यात आला.