शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रझाकारांच्या गोळीबारात १३ तरुण पडले होते धारातीर्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST

कळंब : चैत्राच्या रखरखत्या उन्हात घाडगेंच्या आमराईतील भरल्या बाजारात निजामी राजवटीचे जुलमी ‘बळ’ अचानक दाखल झाले. वार, प्रतिवार चालू ...

कळंब : चैत्राच्या रखरखत्या उन्हात घाडगेंच्या आमराईतील भरल्या बाजारात निजामी राजवटीचे जुलमी ‘बळ’ अचानक दाखल झाले. वार, प्रतिवार चालू झाला. पण, धानोऱ्याच्या पहिलवानांची ‘लाठीकाठी’ हत्यारबंद निजामी शक्तीपुढे फिक्की ठरली. बंदुकीच्या फैरी झडल्या, यात क्षणार्धात १३ देवधानोरेकर धारातीर्थी पडले. दुसऱ्या दिवशी अख्खं गाव हैवानांनी पेटवून दिलं. देवधानोऱ्याची अवस्था ‘जळकं धानोरं’ अशी झाली आणि गावकरी अंगावरच्या कापडानिशी परागंदा झाले. हा चित्तथरारक प्रसंग कथन केला आहे देवधानोरा येथील स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मारुती बोंदर यांनी.

हा प्रसंग घडला त्या १८ एप्रिल १९४८ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मारुती बोंदर हे १६ वर्षांचे होते. या काळात काँग्रेसी विचाराने प्रेरित होऊन जुलमी निजामी राजवटीचा ते प्रतिकार करीत होते. प्रभातफेऱ्या, गस्त यासह त्या काळी चळवळीचा पाया असलेल्या कॅम्पात त्यांचा सक्रिय सहभाग होता. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधला असता अतिशय चित्तथरारक असा प्रसंग त्यांनी कथन केला.

त्या दिवशी देवधानोरा गावात आठवडी बाजार असल्याने संपूर्ण गाव गजबजले होते. याच दिवशी निजाम सरदार कासीम रझवीचा खास ‘हस्तक’ गुंडूबाशा रझाकारांचा फौजफाटा घेऊन गावात दाखल झाला. त्यांनी धाकदडपशाही सुरू केली असता प्रतिकारही सुरू झाला. ग्रामस्थांच्या काठ्या-कुऱ्हाडी विरुद्ध रझाकारांच्या बंदुकी असा संघर्ष पेटला. रझाकारांना विरोध करणारी शक्ती म्हणून निजामी सत्तेच्या डोळ्यांवर देवधानोरा गाव आले होते. याचा बीमोड करण्यासाठीच सुनियोजित कट करून गाव बेचिराख करण्याचा प्रयत्न केला गेला, असे बोंदर यांनी सांगितले.

देवधानोऱ्याचं जळकं धानोरा केलं...

गावातील दुसरे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाजीराव गणपतराव बोंदर म्हणाले, १८ एप्रिल १९४८ रोजी एका क्षणात १३ तरुण गोळीबारात धारातीर्थी पडल्याने गावकरी भयानक दहशतीखाली होते. जुलमी ताकदीने बाजार, घरंदारं लुटली. दुसऱ्या दिवशी रॉकेलने गावातील घरे, गंजी, गोठे पेटवून दिले. क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या गावात चिटपाखरू राहिलं नाही. लोक आपल्या गणगोताकडे, कॅम्पात ‘निर्वासित’ म्हणून आलेला दिवस काढू लागले. याच घटनाक्रमामुळे स्वातंत्र्योत्तर काळात महसुली ‘देवधानोरा’ असं नाव असलेलं आमचं गाव एकमेकांशी संवाद साधकांना मात्र ‘जळकं धानोरं’ म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं.

▪️ सहा महिने गावात दिवा पेटला नाही...

रझाकारानं गाव लुटलं अन् जाळलं. अडीचशे उंबऱ्याच्या गावातील लोक तोंड वळेल त्या गावात आणि नातेवाइकाकडे आश्रित म्हणून राहू लागले. सहा महिने गावात दिवा पेटला नाही. घराला दार अन् विहिरीला पायऱ्या राहिल्या नाहीत. या काळात पुढे स्वामी रामानंद तीर्थ चंद्रशेखर बाजपेयी, बाबासाहेब परांजपे या नेतृत्वाची साथ मिळाली. इकडून तडवळा, चिंचोलीच्या कॅम्पात आधार मिळाला. लोक परतू लागले. घरी स्थिरावू लागले. आजूबाजूच्या गावांतून ज्वारी वगैरे जिन्नस पोहचू लागले. कळंबच्या भगवानदास लोढा यांनी एक ट्रक घोंगड्या दिल्या. एकूणच विस्कटलेले गाव अन् घडी पुन्हा बसू लागली, असे लक्ष्मण बोंदर यांनी सांगितले.