शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या अधिकारांना लागली कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST

‘जलसंधारण’ची कुरघाेडी -प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसाठी ‘झेडपी’च्या नाहरकतीची नाही गरज उस्मानाबाद -राज्यात भाजप-सेना युती सरकार सत्तेत असताना नेहमीच ‘‘हे सरकार ...

‘जलसंधारण’ची कुरघाेडी -प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसाठी ‘झेडपी’च्या नाहरकतीची नाही गरज उस्मानाबाद -राज्यात भाजप-सेना युती सरकार सत्तेत असताना नेहमीच ‘‘हे सरकार जिल्हा परिषदांचे महत्त्व कमी करीत आहे’’, असा आराेप तत्कालीन विराेधकांकडून (सध्याचे सत्ताधारी) हाेत हाेता; मात्र सत्तेत येताच आराेपांचा विसर पडलेल्या विद्यमान राज्यकर्त्यांकडूनही ताेच कित्ता गिरवला जावू लागला आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारेच्या अखत्यारितील कुठल्याही प्रकल्पावर अन्य यंत्रणेला काम करायचे असल्यास ‘नाहरकत’ बंधनकारक हाेती; परंतु ही अट काढून टाकत ‘जलसंधारण’ला (राज्यस्तर) रान माेकळे करून दिले आहे. हाही प्रकार ‘झेडपी’चे खच्चीकरण करणाराच मानला जात आहे.

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित लघु, मध्यम प्रकल्पांसाेबतच पाझर तलाव, साठवण तलाव तसेच काेल्हापुरी बंधाऱ्यांची संख्या माेठी आहे. विशेष म्हणजे, मृद व जलसंधारण (राज्यस्तर) विभागापेक्षा कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता आदी मनुष्यबळही माेठे आहे. असे असतानाही राज्यातील सेना-राष्ट्रवादी व काँग्रेस महाघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने निधी देता जिल्हा परिषदेपेक्षा ‘जलसंधारण’ला अधिक झुकते माप दिले आहे. हे थाेडके म्हणून की काय, अधिकार क्षेत्रातही कुरघाेडी करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या प्रकल्पांच्या अन्य काेणत्याही यंत्रणेला काम करायचे असल्यास ‘झेडपी’ची नाहरकत घेणे बंधनकारक हाेते. त्यामुळे खराेखर काेणत्या प्रकल्पाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे? काेणत्या प्रकल्पास अधिक तरतूद लागणार आहे? यासह आदी बाबींची तपासणी करून नाहरकत दिली जात हाेती; परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ही महत्त्वपूर्ण कमी करून ‘जलसंधारण’ला रान माेकळे करून दिले आहेे. त्यामुळे तत्कालीन भाजप-सेना युती सरकारचाच कित्ता महाविकास आघाडी सरकार गिरवित आहे, हे विशेष.

चाैकट...

मनुष्यबळ अधिक, निधी कमी...

जलसंधारण विभागापेक्षा जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ अधिक आहे. प्रकल्पांची संख्याही माेठी आहे. असे असतानाही डागडुजीसाठी अवघे दहा ते बारा काेटी रुपये दिले आहेत. तर तुलनेत मनुष्यबळ कमी असताना ५० ते ५४ काेटी रुपये दिले आहेत. याबाबत आता पदाधिकाऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.

माेठ्या कामांची बयाणा रक्कमही केली कमी...

निविदा भरताना संबंधित एजन्सीला कामाच्या एकूण रकमेच्या १ टक्के बयाणा रक्कम शासनखाती भरावी लागते. म्हणजेच १ काेटीचे काम असेल तर लाख रुपये शासनाच्या तिजाेरीत जमा हाेतात. हा नियम पूर्वी सर्वांना सारखाच हाेता; परंतु यातही सध्या बदल करण्यात आला आहे. १५ काेटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना १ ऐवजी ०.५ टक्के बयाणा रक्कम निश्चित केली आहे. तर लहान कामांना ती रक्कम १ टक्केच ठेवली आहे. त्यामुळे माेठ्या ठेकेदारांचे एवढे लांगुलचालन का? ही उठाठेव ‘मर्जिती’ल मंडळीसाठी तर नाही ना? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

काेट...

एखादे माेठे काम असेल तर ठेकेदार कमी येतात. ते १ टक्के या प्रमाणे बयाणा रक्कम भरण्यास राजी नसतात. त्यामुळे ही रक्कम शासनाने ०.५ टक्के केली आहे. ही सर्व प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार केली जात आहे.

-कलशेट्टी, कार्यकारी अभियंता, स्थानिक स्तर.