शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

भाजीपाल्याला मातीमोल भाव, फळांचे दरात मात्र होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:21 AM

भाजीपाल्यांच्या दरात होणारा चढाव-उतार शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती घसरलेल्याच आहेत. सध्या फळभाज्यांचे दर कमीच ...

भाजीपाल्यांच्या दरात होणारा चढाव-उतार शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती घसरलेल्याच आहेत. सध्या फळभाज्यांचे दर कमीच आहेत. पत्ताकोबी, फ्लावर १० रुपये, टोमॅटो १० ते १५ रुपये, वांगी, भेंडी, शिमला मिरची ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. बटाट्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. बटाटा १० ते १५ रुपये किलो, कारले, दोडका ४० रुपये, गवार ५०, शेवगा ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. भाज्यांचे दर उतरत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे फळांच्या किमतीत प्रतिदिन वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.

खाद्यतेलाचे दर चढेच

खाद्यतेलाचे दरात प्रतिदिन वाढ होत आहे. सोयाबीन तेल १२३ रुपये, पामतेल १२० रुपये किलो, शेंगदाणा १५० ते १६० रुपये, मोहरी तेल १३५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. तूर डाळ ९६ रुपये, हरभरा डाळ ५६, मूग ९० रुपये, उडीद ९०, मसूर डाळ ६५ रुपये किलोने विक्री होत आहे. साखरेचा दर स्थिर असून, साखर ३२ रुपये किलोने विक्री होती.

पालेभाज्या स्वस्तच

बाजारात मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती उतरलेल्याच आहेत. शेपू १० रुपये जुडी, कोथिंबीर, मेथी, चुका, पालकाची जुडी ५ रुपयास जुडी विक्री होत आहे. गाजराची आवक अधिक असल्याने गाजर १० ते १५ रुपये किलोने विक्रीस उपलब्ध आहेत.

रामफळ ८० रुपये किलो

बाजारपेठेत सफरचंद १२० ते १६० रुपये किलो, रामफळ ८०, मोसंबी १००, संत्रा ६०, द्राक्ष ६० ते ८० रुपये, चिकू ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे.

भाजीपाला वगळता खाद्यतेल व इतर किराणा सामानाचे दरात वाढ होत आहे. फळांचे दर वाढतच आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. सचिन लोखंडे, ग्राहक

मागील महिन्यात तूर डाळ ८५ रुपये किलो होती. गेल्या आठवड्यात तूर डाळ १०२ वर किलोने विक्री होत आहे. या आठवड्यात तूर डाळीचा दर ९६ रुपये किलो इतका आहे. खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत.

अमित भराटे, किराणा व्यावसायिक

बाजारात फळांची आवक वाढली आहे. थंडीमुळे रसदार फळांना मागणी कमी आहे. मात्र, फळांचे दर वाढलेले आहेत. उन्ह वाढल्यानंतर फळांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

अमोल पेठे, फळविक्रेते