शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसापासून घाटपिंप्री अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील घाटपिंप्री गावात गेल्या पंधरा दिवसापासून वीज नसल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडावे लागत आहे. विजेअभावी गावाचा पाणीप्रश्न ...

पारगाव : वाशी तालुक्यातील घाटपिंप्री गावात गेल्या पंधरा दिवसापासून वीज नसल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडावे लागत आहे. विजेअभावी गावाचा पाणीप्रश्न देखील भीषण बनला असून, हातपंपावरील पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५२ च्या पश्चिमेला घाटपिंप्री गाव आहे. या गावाला भूम तालुक्यातील ईट येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या गावासाठी २५ केव्हीएचे तीन ड्रम आहेत. हे तिन्ही ड्रम ४ सप्टेंबर रोजी जळाले. यानंतर पुढच्या पाच दिवसात ड्रम बसवून वीज पुरवठा जोडण्यात आला. मात्र, २१ सप्टेंबर रोजी पुन्हा हे ड्रम जळल्याने गाव पुन्हा अंधारात चाचपडत आहे.

गावात २७० वीज ग्राहक आहेत. यातील नियमित बिल भरणाऱ्यांची संख्या दोनशे आहे. याउलट अनधिकृत पणे वीज वापरणाऱ्याची संख्या याहून दुप्पट आहे. त्यामुळे येथील ड्रम सतत्याने जळत आहेत. परिणामी नियमित वीज बिल भरणा करणाऱ्यांना याचा फटका बसत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. यासंदर्भात भूमचे वरिष्ठ अभियंता प्रशांत शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ईट येथील कनिष्ठ अभियंता पी. पी. बरडे यांचा फोन लागला नाही. याठिकाणी लाईनमन म्हणून काम करणारे नवनाथ आणेराव यांनी येत्या सोमवारी या ठिकाणी ड्रम बसवले जातील, असे सांगितले.

कोट..........

गावातील वीज प्रश्नाबाबत वारंवार अधिकाऱ्यांना बोललो. मात्र, ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. विजेचा होणारा बिघाड हा अनधिकृत वीज जोडणीमुळे होत असून, प्रशासनाने त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. मात्र, वीज वितरण कंपनी आशा लोकांना पाठीशी घालून नियमित वीज बिल भरणा करणाऱ्यांंना वेठीस धरत आहे.

- सुजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य

गावाला वीज पुरवठा नसल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. सध्या हात पंपावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. काही जणांनी शेतातून घराकडे पाणी आणत आहेत. अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष आहे. प्रशासनाने तात्काळ विजेचा प्रश्न सोडवावा, नाहीतर ग्रामस्थांना घेऊन ग्रामपंचायत आंदोलन करेल.

- किरण सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य

गावात चोरून वीज वापरणाऱ्यांमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज चोरीमुळे सातत्याने काही न काही बिघाड झालेला असतो. गावात आठ दिवसापासून वीज नाही. महावितरणही लक्ष देत नाही. त्यामुळे नियमित वीज बिल भरणाऱ्यांची गोची झालेली आहे.

- जयचंद्र सातपुते, वीज ग्राहक