शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत सुरू होणार पहिले टेस्ट ट्युब बेबी सेंटर

By admin | Updated: October 31, 2014 00:34 IST

उस्मानाबाद : शहरातील डॉ. राजगुरू यांच्या अक्षय हॉस्पिटलमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानासह मोड्युलर टेस्ट ट्युब बेबी सेंटर सुरू करण्यात येत आहे.

उस्मानाबाद : शहरातील डॉ. राजगुरू यांच्या अक्षय हॉस्पिटलमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानासह मोड्युलर टेस्ट ट्युब बेबी सेंटर सुरू करण्यात येत आहे. या सेंटरचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते २ नोव्हेंबर रोजी होत असल्याची माहिती सेंटरचे डॉ. अदिनाथ राजगुरू यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. कौशाली राजगुरू यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना डॉ. राजगुरू म्हणाले की, अक्षय हॉस्पिटल आणि वंध्यत्व निवारण केंद्राच्या माध्यमातून आजवर हजारो अपत्यहीन जोडप्यांना अत्याधुनिक उपचार पध्दतीद्वारे अपत्य प्राप्तीचा आनंद दिला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशातूनही वंध्यत्त्वत्रस्त जोडपी येत गेली, आणि त्यांना अपत्य प्राप्तीचा आंनदही मिळत गेला. अनेक अद्ययावत उपचार करूनही अपत्य प्राप्ती होत नसल्यास शेवटचा पर्याय म्हणून टेस्ट ट्युब बेबी सेंटरकडे पाहिले जाते. परंतु, उस्मानाबाद व परिसरातील अपत्यहीन जोडप्यांना यासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी जावे लागत होते. तसेच खर्चही मोठ्या प्रमाणात होत असे. परंतु, उस्मानाबादसारख्या भागातील दाम्पत्यांना हा खर्च पेलावत नसे. हीच गरज लक्षात घेवून आम्ही उस्मानाबाद येथे हे सेंटर सुरू करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. या सेंटरमध्ये जपान, इंग्लंड, डेन्मार्क, अमेरिका या देशातून अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच येथे असलेल्या ओहम डोनेशन (स्त्रीबीज दान), एम्ब्रीओ डोनेशन या सुविधांमुळे उपचार पद्धतीची यशस्वीता आणि परिणामकारकता सर्वाधिक असल्याचे डॉ. राजगुरू यांनी यावेळी सांगितले.सदरील सेंटरचे उद्घाटन २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जयपाल चव्हाण, टेस्ट टयुब बेबी स्पेशालिस्ट डॉ. सचिन कुलकर्णी, सोलापूरच्या मार्र्कं डेय सहकारी रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम, बालरोग तज्ज्ञ डॉ. अभय शहापूरकर, डॉ. स्मिता शहापूरकर, एसबीआयचे चिफ मॅनेजर विजय डिकले आदींची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. सदरील कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही डॉ. राजगुरू यांनी केले आहे.(वाणिज्य वार्ता)