शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
4
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
5
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
6
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
7
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
8
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
9
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
10
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
11
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
12
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
13
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
14
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
15
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
16
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
17
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
18
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
19
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
20
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांमुळे जिल्ह्यातील महामार्गांच्या काेट्यवधीच्या कामांना काेलदांडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST

उस्मानाबाद -दळणवळणाची सुविधा अधिक गतिमान व्हावी, यासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख मार्गांसाठी काेट्यवधीचा निधी मंजूर करण्यात आला. कामेही सुरू झाली. ...

उस्मानाबाद -दळणवळणाची सुविधा अधिक गतिमान व्हावी, यासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख मार्गांसाठी काेट्यवधीचा निधी मंजूर करण्यात आला. कामेही सुरू झाली. परंतु, ही कामे अपेक्षित गतीने करण्यात आली नाहीत. परिणामी आठ-आठ वर्षांचा कालावधी लाेटूनही साेलापूर-हैदराबाद सारख्या महत्वपूर्ण महामार्गाचे काम रखडले आहे. हे काम सुरू नसतानाही टाेल वसुली मात्र जाेरात सुरू आहे. खामगाव-पंढरपूर या रस्त्याचे काम सुरू हाेऊन चार वर्षांचा कालावधी लाेटला. मात्र, आजही ३० पैकी ६ किमीचे काम ठप्प आहे. या दाेन्ही मार्गांवर वाहनांची माेठी वर्दळ असते. त्यामुळे वाहनधारकांना सातत्याने वाहतूक काेंडीचा सामना करावा लागताे. एवढेच नाही, तर लहान-माेठ्या अपघाती घटनांचे प्रमाणही वाढले आहे. उपराेक्त चित्र लक्षात घेता, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यानी रस्त्यांची कामे गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

चाैकट...

खामगाव-पंढरपूर

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या खामगाव-पंढरपूर या सुमारे ४५० किमी अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. यातील कुसळंब ते केज असा ६० किमीचा एक स्वतंत्र पॅकेज असून त्यासाठी साडेचारशे कोटी रुपये मंजूर आहेत. या पॅकेजमधील ३० किमी अंतराचे काम उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. तब्बल चार वर्षानंतर यापैकी २४ किमीचे काम पूर्ण करण्यात आले असून, ६ किमीचे काम ठप्प झाले आहे. कंत्राटदाराने दुसरे माेठे काम हाती घेतल्याने सर्व यंत्रणा त्या कामावर शिफ्ट केली. त्यामुळे हे काम रखडले आहे.

हैदराबाद-साेलापूर

शंभर किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणासाठी जवळपास शेकडो हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या चौपदरीकरणाचे अद्याप पूर्ण झालेले नाही. सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून अनेक ठिकाणी उपाययाेजना केलेल्या नसतानाही ठेकेदार कंपनीने ८० टक्के चाैपदरीकरण झाल्याचे दाखवून टाेल वसुलीस परवानगी मिळविली. दीड वर्षांपासून इटकळ व तलमाेड अशा दाेन टाेलनाक्यांवरून टाेल वसुली सुरू आहे. उर्वरित चाैपदरीकरणाचे काम मात्र बंद आहे. एवढेच नाही तर एकाही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी केवळ दाेन वर्षांची मुदत हाेती, हे विशेष.

राजकारणी काय म्हणतात..?

आठ वर्षांपासून काम सुरूच आहे. चाैपदरीकरणाचे काम अर्धवट आहे. उड्डाणपुलाची कामे झालेली नाहीत. जे काम झाले आहे, तेही दर्जाहीन आहे. तरीही टाेलवसुली सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने वेळाेवेळी आवाज उठविला आहे. यापुढेही पाठपुरावा करू.

-प्रा. सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस.

जिल्ह्यातील साेलापूर-हैदराबाद तसेच पंढरपूर मार्गांचे काम रखडले आहे. त्यास काेणत्याही पक्षाचे पदाधिकारी जबाबदार नाहीत. ठेकेदारांची भूमिकाही कामे रखडण्यास जबाबदार आहे. रखडलेल्या कामांना गती मिळावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू.

-ॲड. धीरज पाटील, जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस.