शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधीच सरण रचलं गेलं! देवदर्शन घेऊन परतताना भावी पती-पत्नीला काळाने गाठलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:49 IST

कुलदैवताचे दर्शन ठरले शेवटचे; खंडोबाच्या दर्शनाहून परतताना काळाची झडप

जेवळी (जि. धाराशिव) : मे महिन्यात ज्यांच्या लग्नाची सनई वाजणार होती, त्या भावी पती-पत्नीवर काळाने झडप घातली आहे. नळदुर्गच्या खंडोबाचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या भीषण अपघातात जेवळी पूर्व तांडा येथील बबन पवार आणि रोहिणी राठोड या जोडप्याचा अंत झाला. महामार्गावरील अर्धवट कामामुळे दोन सुखी संसारांची स्वप्ने क्षणात महामार्गावर विखुरली गेली आहेत.

बबन गोपा पवार (वय २६) हे मुंबईत फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वीच त्याचा रोहिणी बाबू राठोड (२२) यांच्याशी साखरपुडा झाला होता. घराचे बांधकाम सुरू असल्याने मे महिन्यात विवाह सोहळा पार पडणार होता. "कारखाना पट्टा पडला की मे महिन्यात लग्न करू," असे नियोजन दोन्ही कुटुंबांनी केले होते. लग्नाच्या याच आनंदात दोघेही रविवारी दुपारी नळदुर्गच्या खंडोबाचे दर्शन घेऊन घराकडे निघाले होते. दुपारी दोनच्या सुमारास दस्तापूर गावाजवळ मागून येणाऱ्या एका भरधाव टँकरने (एम.एच. ४२-एक्यू ६७९६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी ३० फूट फरफटत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या अपघातात बबनचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहिणीला मदतीसाठी श्यामसुंदर तोरकडे, अल्ताफ पटेल, अर्जुन दंडगुले व सहकाऱ्यांनी तातडीने जळकोट येथील रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

तांड्यावर शोककळाज्या घरात लग्नाची लगबग सुरू व्हायची, तिथे आता फक्त हुंदके आणि करुण आकांत ऐकू येत आहे. हळदीच्या आधीच या दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने जेवळी पूर्व तांडा परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले.

प्रशासनाच्या दिरंगाईने घेतला बळी?महामार्ग क्रमांक ६५ वर दस्तापूरजवळ डिव्हायडरसाठी जागा सोडण्यात आली आहे, मात्र हे काम कित्येक दिवसांपासून अर्धवट आहे. तिथे ना डिव्हायडर आहे, ना धोक्याचा कोणताही सूचना फलक. याच अर्धवट कामामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या या दुर्लक्षामुळे दोन उमद्या तरुणांचे प्राण गेले असून, "आणखी किती बळी घेतल्यावर प्रशासनाला जाग येईल?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy Strikes: Couple Dies in Accident Before Wedding Day

Web Summary : A couple, soon to be married, tragically died in an accident while returning from a temple visit. Incomplete highway work is blamed for the accident, sparking outrage among villagers who question administrative negligence and demand accountability for the loss of young lives. The village mourns the devastating loss.
टॅग्स :dharashivधाराशिवAccidentअपघातDeathमृत्यू