शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या वर्षीही आषाढी वारीवर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

कळंब : ‘कधी होईल भेट, कधी मिळेल नजर, तुझ्या अंगणात कधी करू, हरिनामाचा गजर’ अशीच भावना यंदाही आषाढी ...

कळंब : ‘कधी होईल भेट, कधी मिळेल नजर,

तुझ्या अंगणात कधी करू, हरिनामाचा गजर’ अशीच भावना यंदाही आषाढी वारीसाठी पंढरपूरला न जाऊ शकणाऱ्या वारकऱ्यांची झाली असेल. कळंबमार्गे दरवर्षी शंभर सव्वाशेच्या घरात जातील एवढ्या लहानमोठ्या दिंड्या पंढरपूरकडे पायी जातात. परंतु, मागील वर्षीप्रमाणे कोरोनाने यंदाही या दिंड्यांचे दर्शन कळंबकरांना होणार नसल्याने हा भक्तीचा महिना सुनासुना वाटतो आहे.

समाधानकारक पाऊस पडला तर पेरण्या करून नाहीतर घरातील इतर सदस्यांवर जबाबदारी टाकून आषाढी वारीनिमित्त नित्यनेमाने अनेक वारकरी पंढरपूर गाठतात. दरवर्षी पंढरपूरला पायी वारीला जाणाऱ्या विविध दिंड्या कळंबमार्गे जातात. आषाढी एकादशीच्या जवळपास एक महिना आधी या दिंड्या त्यांच्या मूळ गावातून निघतात. कळंब येथे पोहोचल्यानंतर पुढे सात ते आठ दिवसात पंढरपूर गाठायचे असे त्यांचे नियोजन असते. मागील वर्षी दिंड्यांची ही वर्षानुवर्षे चालणारी परंपरा कोरोना प्रादुर्भावामुळे खंडित झाली. यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे व तिसऱ्या लाटेच्या भीतीने शासनाने वारीच रद्द केल्याने सलग दुसऱ्यावर्षी वारकरी आणि विठ्ठल यांची मुखामुखी भेट होणार नाही.

दरवर्षी आषाढी एकादशीसाठी कळंबमार्गे जवळपास शंभर ते सव्वाशे लहानमोठ्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. यातील अनेक दिंड्यांना मोठी परंपरा आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्हा वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील बहुतांश वारकरी कळंबमार्गे पंढरपूर गाठतात. विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यातील जवळपास सर्वच दिंड्या कळंबमार्गे जातात.

ज्ञानदेव-तुकारामाचा गजर करीत भक्तीत तल्लीन होऊन निघालेल्या या वारकऱ्यांमुळे कळंब शहरात तसेच या मार्गावरील गावातही भक्तिमय वातावरण असते. अनेक ठिकाणी मुक्काम, भोजन व पहाटे भजन-कीर्तन करून हे वारकरी पुढे प्रस्थान करतात. यावर्षीही तो सत्संग घडणार नसल्याने भाविकांनाही चुकल्यासारखे वाटणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थानची दिंडी ही आषाढी वारीसाठी जाणारी सर्वात जास्त वारकरी असलेली दिंडी असते. दरवर्षी कळंब येथे मुक्कामी असलेल्या या दिंडीतील संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे हजारो भक्त दर्शन घेतात. मागील आणि यावर्षीही दिंड्यांना परवानगी नसल्याने महाराजांचे दर्शन होणार नसल्याची खंत भाविकांना आहे.

चौकट -

पालखी मार्ग तयार, वारकरीच नाहीत

विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच संत श्री गजानन महाराज व श्री विठ्ठल यांना जोडणारा खामगाव ते पंढरपूर हा पालखी मार्ग म्हणून ओळखला जाणारा भाग आता चौपदरीकरणासह राष्ट्रीय महामार्ग म्हणून जवळपास पूर्ण झाला आहे. हरिनामात तल्लीन असलेल्या वारकऱ्यांनी या मार्गावरील चिखल तुडवीत, खड्ड्याचा अडथळा पार करीत अनेक वर्षे पंढरी गाठली. आता हा रस्ता चौपदरीकरणामुळे व्यवस्थित झाला आहे. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे पंढरपूरमध्ये ‘नो एन्ट्री’ असल्याने वारकरी वारीसाठी निघालेच नाहीत. त्यामुळे पालखी मार्ग झाला पण वारकरीच नाहीत, असे चित्र सध्या दिसत आहे.

७० वर्षांची परंपरा खंडित

कळंब येथील जुन्या सोनार गल्लीतील बंडोपंत दशरथ यांची वारकऱ्यांना अन्नदानाची ७० वर्षाची परंपरा आहे. दरवर्षी आषाढी वारीसाठी जाणाऱ्या ५८ दिंड्यांतील जवळपास ५ हजार वारकऱ्यांची दशरथ कुटुंब जेवणाची व्यवस्था करते. मध्य प्रदेशातील २ तर विदर्भातील गोंदिया, नागपूर, यवतमाळ, अमरावती या भागातील दिंडीतील वारकरी कळंब येथे दशरथ कुटुंबीयांच्या अन्न सेवेचा लाभ घेतात. प्रत्येक दिंडीतील एक सदस्य दोन दिवस आधी येऊन दिंडीतील वारकऱ्यांची संख्या आदींबाबत माहिती देतो. त्याप्रमाणे व्यवस्था केली जाते, असे पंडित दशरथ यांनी सांगितले. मागच्या वर्षी व यंदाही ही परंपरा खंडित झाल्याने काहीतरी राहून गेले, अशी भावना झाल्याचेही दशरथ म्हणाले.

कॅप्शन -

कळंब शहरातून जाणारा खामगाव -पंढरपूर हा पालखी मार्ग जवळपास पूर्ण झाला आहे. मात्र, ज्या वारकरी मंडळीमुळे दरवर्षी आषाढी वारीदरम्यान हा मार्ग गजबजतो तो यंदा सुनासुना वाटतो आहे.