शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खवा, पेढा व्यवसायावर पुन्हा कोरोना संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST

(फोटो : अरुण देशमुख ०८) भूम : पहिले लॉकडाऊन बंद होऊन सर्व व्यवसाय सुरळीत सुरू होत असतानाच, मागील पंधरा ...

(फोटो : अरुण देशमुख ०८)

भूम : पहिले लॉकडाऊन बंद होऊन सर्व व्यवसाय सुरळीत सुरू होत असतानाच, मागील पंधरा दिवसांपासून पुन्हा सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याचा परिणाम परत बाजारपेठेवर जाणवू लागला असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या खवा, पेढा व्यावसायिकांनादेखील याचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. या व्यवसायावर मंदीचे सावट आले असून, भाव कमी होऊन मागणी घटल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील जांब येथे महादेव विश्वेकर गुळवे व त्यांचे बन्धू श्रीपाद सिद्धेश्वर गुळवे हे अनेक वर्षांपासून खवा-पेढा तयार करण्याचा व्यवसाय करतात. अंत्याधुनिक पद्धतीन कंदी पेढा व दुधापासून तयार होणार खवा ते बनवतात. तसे पाहता तालुक्यात खवा बहुतांश व्यापारी बनवतात. परंतु कंदी पेढा (बरणी पॅकिंग) बनविण्याचा व्यवसाय खूप कमी लोक करतात. त्यातीलच गुळवे बंधू हेही आहेत. त्यांनी एप्रिल २०२० मध्ये पहिले लॉकडाऊन पडल्यानंतर हा व्यवसाय सुरू करून २० कुटुंबांना यातून रोजगार उपलब्ध दिला. मागणीनुसार महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान स्थळांवर त्यांचा हा कंदी पेढा जातो. ‘गुळवे आप्पा पेढा’ म्हणून या पेढ्याची वेगळी ओळख आहे.

गतवर्षी कोरोना संकटामुळे या व्यवसायावर संकट ओढवले होते. कोरोना संकटामुळे गतवर्षीच्या सर्व यात्रा-उत्सवही रद्द करण्यात आले. जवळपास सर्वांचेच खवा, पेढा उत्पादन बंद पडले होते. आता अनलॉकनंतर पुन्हा सर्व व्यवसाय सुरळीत होत असताना मागील महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणारी भाविकांची संख्याही घटली असून, अनेक ठिकाणच्या यात्रा पुन्हा रद्द होत आहेत. पर्यायाने पेढ्यांची मागणीही घटली आहे. वास्तविक देवस्थान खुले झाल्यानंतर ३०० किलो खवा, पेढा बनवावा लागत होता. परंतु मागील महिन्यापासून मागणी घटल्याने ५० ते १५० किलो खवा तयार करण्याची वेळ आली आहे. मागील लॉकडाऊन संपल्यानंतर एक किलो खव्याला २०० ते २५० रुपये भाव मिळत होता. परंतु, आता पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागल्याने हा दर पुन्हा १५० ते १६० रुपयांवर आला असल्याचे गुळवे यांनी सांगितले.

कोट.......

मागील महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने खवा, पेढ्याची मागणी घटली आहे. भाव कमी झाल्याने किलोमागे १५ ते ३० रुपये नफा मिळत आहे. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

- श्रीपाद सिद्धेश्वर गुळवे, खवा व्यापारी, जांब