शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी ४० हजारांवर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३,८१,५८४ शेतकरी हक्काच्या पीकविम्यापासून आजही वंचित असून, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांकडे मागणी अर्ज द्यावेत तसेच स्थानिक ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३,८१,५८४ शेतकरी हक्काच्या पीकविम्यापासून आजही वंचित असून, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांकडे मागणी अर्ज द्यावेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठवावेत, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले होते. यास प्रतिसाद देत आतापर्यंत चाळीस हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज कृषी विभागाकडे धडकले आहेत. शिवाय, तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींनी ठराव पाठविले असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांचा जन्मदिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करत विविध मार्गाने आपण बळीराजाचा सन्मान करत असतो. परंतु, मागील सहा महिन्यांपासून खरीप २०२० मधील हक्काचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकरी सरकारला आर्त साद घालत असताना अजूनही जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ५८४ शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील या विषयी विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत साधी बैठकही बोलविली जात नाही.

दरम्यान, राज्य सरकारने नुकसान झाल्याचे मान्य करत अनुदान दिले, परंतु विमा भरपाईबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न करूनदेखील उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता न्यायालयीन रणनीती म्हणून अनुदान मिळालेल्या परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे मागणी अर्ज देऊन रितसर पोहच घ्यावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवावेत, असे आवाहन आ. पाटील यांनी शेतकऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना केले होते. याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ४० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत कृषी सहाय्यकांकडे अर्ज केले आहेत. शिवाय, अनेक ग्रामपंचायतीने ठराव घेतले आहेत. विशेषतः तुळजापूर तालुक्यातील सर्वच १०८ ग्रामपंचायतींनी ठराव घेत शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसान भरपाई देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केले आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनी ठराव घेण्याचे व शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

चौकट.........

पुढील काळात तीव्र लढा उभारणार

उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ८०% शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा खरीप २०२० हंगामातील प्रलंबित पीकविमा अजूनही मिळाला नाही. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून या कृषीदिनी राज्य सरकारने बळीराजाच्या आर्त सादेला प्रतिसाद न दिल्यास पुढील काळात तीव्र लढा उभारण्याचा इशारा आ. पाटील यांनी दिला आहे.

--------------

[फोटो कॅप्शन : ग्रामपंचायत ठरावांच्या प्रती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे सुपुर्द करताना तुळजापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते.]