शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
4
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
5
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
6
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
7
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
8
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
9
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
10
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
11
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
12
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
13
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
16
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
17
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
19
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
20
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
Daily Top 2Weekly Top 5

पारगाव गटातील ३४ किमी रस्त खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटातील वेगवेगळ्या गावांना जोडणाऱ्या एकूण जवळपास ३४ किमी अंतराचे रस्ते खड्डेमय बनले ...

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटातील वेगवेगळ्या गावांना जोडणाऱ्या एकूण जवळपास ३४ किमी अंतराचे रस्ते खड्डेमय बनले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या रस्त्यावर चिखल व पाणी साचत असल्याने, वाहनधारकांना यातून वाट शोधताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप रहिवाशांमधून केला जात आहे.

वाशी तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटातील राज्य मार्ग ते बनगरवाडी पुढे घटपिंपरी हा सहा किमी, राज्य मार्ग ते दहिफळ ४ किमी, राज्य मार्ग ते शेलगाव ३ किमी, तसेच पारगाव ते गिरवलीमधला मार्ग ५ किमी, शेंडी फाटा ते शेंडी तीन किमी, पारगाव ते हातोला अर्धा रस्ता अडीच किमी, हातोला ते पांगरी दोन किमी, ब्रह्मगाव फाटा ते ब्रह्मगाव पाच किमी, राज्य मार्ग ते रुई ४ किमी असा जवळपास ३५ किमी अंतराच्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

पारगाव-गिरवली हा रस्ता ईटकडे जाण्यासाठी वाहन चालकांना सोईस्कर आहे. या रस्त्यामुळे वाहनचालकाना टोलचा भुर्दंड बसत नाही. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजीही झालेली नाही. त्यामुळे सध्या या रस्त्यावरून दुचाकी चालविणेही कठीण झाले आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याच्या बाबतीत तत्काळ लक्ष देऊन वाहन चालकाना रस्ता वापरण्यायोग्य करून देण्याबाबतचा ठराव पारगाव ग्रामपंचायत सदरील कार्यालयाला देणार आहे.

- कॉ.पंकज चव्हाण, उपसरपंच, पारगाव

वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथे सतत वर्दळ असते. मात्र, राज्य मार्ग ते घाटपिंपरी पर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण अधिक असल्याने वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे. अनेकदा रुग्णालाही वेळेत दवाखान्यात पोहोचविणे शक्य होत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी व संबंधित विभागातील अधिकारी यांनी लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा.

- विनोद पाटील, ग्रा.पं. सदस्य, घटपिंपरी

राज्य मार्गापासून दहिफळ व शेलगावपर्यंत येणारे दोन्ही रस्ते पूर्णपणे उखडले गेलेले आहेत. या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने, रात्री अपरात्री काही घटना घडल्यास, राज्यमार्गावरून उस्मानाबाद किंवा बीडकडे जाण्यासाठी खूप वेळ लागतो. मागच्या २५ वर्षांत या रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठराव देणार आहोत.

- सुनीता भैरट, सरपंच, दहिफळ

240721\img-20210720-wa0031.jpg~240721\img-20210719-wa0012.jpg~240721\img-20210719-wa0023.jpg

पारगाव गिरवली रस्त्याची बकाल अवस्था~दहिफल रस्ता~घटपिंपरी रस्ता