शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भूममध्ये ३१ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:22 AM

भूम : यंदा तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी चाढ्यावर मूठ धरली असून, तालुक्यात ...

भूम : यंदा तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी चाढ्यावर मूठ धरली असून, तालुक्यात १५ जून अखेर ३१ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या हंगामात शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन या पिकास अधिक पसंती दिल्याचे सध्या सुरु आसलेल्या पेरण्यांवरुन दिसून येत आहे.

यंदा तालुक्यात महाबीजच्या बहुतांश बियाणाचा सुरूवातीपासूनच तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यात पुन्हा गतवर्षीचा पीक विमा न मिळाल्याने तसेच कोरोनामुळे आर्थिक अडचणही आहेच. सध्या उसनवारी करुन बी-बियाणाची जुळवाजुळव करत खरिपातून काहीतरी उत्पन्न हाती लागेल, या आशेने शेतकरी पेरणी करताना दिसत आहे.

तालुक्यात खरिपाचे ४९ हजार ३८६ हेक्टर क्षेत्र असून, गेल्या पाच-सहा दिवसापूर्वी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीस प्रारंभ केला. सुरूवातीपासूनच सोयाबीनचा तुटवडा असल्याने मिळेल त्या कंपनीचे व घरगुती बियाणाची जुळवाजुळव शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात पाच मंडळापैकी अंबी मंडळात १३५.२० मिमी, याखालोखाल माणकेश्वर मंडळात ११८ मिमी तसेच भूम मंडळाच्या काही भागात पाऊस झाल्याने या भागात पेरण्या सुरु आहेत. वालवड व ईट मंडळात मात्र अद्याप पाऊस कमी असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र सरासरी ४९ हजार ३८६ हेक्टर असून, १५ जून अखेर १४ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या हंगामात ज्वारी ५३५.४५ हेक्टर, बाजरी १ हजार ६४७.९४ हेक्टर,, मका २५०० हेक्टर, तूर ९ हजार ७०० हेक्टर, उडीद ८ हजार २०० हेक्टर, मूग ३ हजार ५०० हेक्टर, तीळ ३५० हेक्टर, सोयाबीन १५ हजार ५०० हेक्टर, सूर्यफूल ५२३ हेक्टर, कारळे १०९ हेक्टर, तर कापूस ४ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. तालुक्यात यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी सध्या तरी उडीद पिकास पसंती दिली असून, याचे सरासरी क्षेत्र ८ हजार २०० हेक्टर असताना सध्या ४ हजार १०० हेक्टरवर म्हणजेच ५० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यापाठोपाठ सोयाबीन पिकास पसंती दिल्याचे दिसत आहे. यंदा कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४ हजार ५३१ हेक्टर असले तरी आतापर्यंत केवळ १० हेक्टर म्हणजेच २२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी निखील रायकर यांनी दिली.