शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:45 IST

वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी त्याने आपली वडिलोपार्जित जमीन विकली, दोन वेळा बोहल्यावर चढला, पण प्रत्येक वेळी त्याच्या पदरी फक्त फसवणूक आणि मानसिक त्रास आला.

लग्न करून संसार थाटण्याचे स्वप्न एका ३० वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी त्याने आपली वडिलोपार्जित जमीन विकली, दोन वेळा बोहल्यावर चढला, पण प्रत्येक वेळी त्याच्या पदरी फक्त फसवणूक आणि मानसिक त्रास आला. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून, हरिज्ञान सिंह नावाच्या या पीडित तरुणाला मध्यस्थांनी दोन वेगवेगळ्या महिलांशी लग्न लावले, पण लग्नानंतर काही तासांतच दोन्ही नववधू दागिने आणि रोकड घेऊन पसार झाल्या.

दिल्लीतील एका हॉटेलमध्ये नोकरी करणारा हरिज्ञान सिंह आयुष्यात एकटी पडलेली पत्नीची जागा भरून काढण्यासाठी खूप उत्सुक होता. त्याला वाटले होते की तो लवकरच आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करेल, म्हणून त्याने आपल्या पैशाची पर्वा न करता आपली जमीन विकून टाकली. या विक्रीतून मिळालेले ४.५ लाख रुपये त्याने लग्नाच्या तयारीसाठी वापरले. पण, लग्नाच्या नावाखाली गावकऱ्यांनी केलेल्या फसवणुकीमुळे त्याला आपला पैसा, दागिने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनःशांती गमवावी लागली.

एक रात्र राहिली आणि दागिने घेऊन पसार

हरिज्ञानला लग्न करण्यासाठी गावातील एका दाम्पत्याने आणि एका अन्य तरुणाने गाठले. लग्नाचे आश्वासन देत त्यांनी हरिज्ञानकडून पहिल्यांदा १.२० लाख रुपये घेतले. मध्यस्थांनी त्याचे बुलंदशहर येथील गीता नावाच्या महिलेशी लग्न लावले. हरिज्ञानने मोठ्या थाटामाटात लग्न केले, पण त्याचे हे सुख फार काळ टिकले नाही. लग्नानंतर अवघ्या एका रात्रीत, पहाटे ४ च्या सुमारास, गीता सोन्याचे झुमके, चांदीचे पैंजण आणि अन्य दागिने घेऊन घरातून फरार झाली.

पैसे परत मागण्यासाठी हरिज्ञान आणि त्याचा भाऊ राजू मध्यस्थांकडे गेले असता, त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले, पण गावकऱ्यांच्या मध्यस्थीने ते शांत झाले.

दीड लाखांना घातला गंडा, 'बहिणी'सोबत झाली गायब!

पहिल्या फसवणुकीनंतर हरिज्ञान सावरत असतानाच, चार महिन्यांनी तेच मध्यस्थ पुन्हा आले. यावेळी त्यांनी हरिज्ञानला पुन्हा एकदा लग्नाचे आमिष दाखवले. दुसऱ्या लग्नासाठी त्यांनी हरिज्ञानकडून पुन्हा १.५० लाख रुपये उकळले. यावेळी हरिज्ञानचे लग्न बुलंदशहर येथील रिंकू देवी नावाच्या महिलेशी लावले.

पुन्हा एकदा हरिज्ञान नवरदेव बनला, पण रिंकूही त्याच्यासोबत फार काळ राहिली नाही. अवघे तीन दिवस सोबत राहिल्यानंतर रिंकूने अशक्तपणाचे कारण सांगितले. ती तिचा कथित 'भाऊ' असल्याचे सांगणाऱ्या एका तरुणासोबत दिल्लीला जाण्याचा बहाणा करून घरातून निघाली. जाताना तिने घरात असलेली रोकड, दागिने आणि काही मौल्यवान वस्तू सोबत नेल्या. त्यानंतर ती सासरी परतलीच नाही, किंवा तिच्या माहेरचाही पत्ता लागला नाही.

पोस्टर घेऊन रस्त्यावर, 'माझी बायको परत मिळवून द्या'!

या दोन्ही घटनांमध्ये हरिज्ञानचे एकूण २.७० लाख रुपये फसवणुकीत गेले. जमीन विकून मिळालेले पैसेही लग्नाच्या खर्चात आणि फसवणुकीत वाया गेले. या दोन्ही तथाकथित वधू दागिने आणि रोकड घेऊन फरार झाल्यामुळे हरिज्ञानवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

सतत पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, निराश झालेल्या हरिज्ञानने एक अनोखे पाऊल उचलले आहे. त्याने एक पोस्टर बनवले आहे, ज्यावर स्पष्ट लिहिले आहे—‘मला माझी बायको परत मिळवून द्या!’ हे पोस्टर हातात घेऊन तो अलीगढच्या रस्त्यांवर फिरत आहे. हरिज्ञानची एकच मागणी आहे: "माझी जमीन गेली, माझे पैसे गेले, पण निदान मला माझी पत्नी तरी परत मिळवून द्या. मला फक्त न्याय हवा आहे."

तपास सुरू; दोषींवर होणार कारवाई!

या संपूर्ण प्रकरणाची तक्रार हरिज्ञानने एसएसपी नीरज जादौन यांच्याकडे केली आहे. सीओ गभाना धनंजय सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, 'या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,' असे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्यापपर्यंत दोन्ही फरार वधू आणि मध्यस्थ-दाम्पत्याचा कोणताही मागमूस लागलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWeddingशुभविवाहUttar Pradeshउत्तर प्रदेश