दुःखद! लग्नादिवशीच वराच्या भावाचा अपघाती मृत्यू; वरातींना भरधाव कारने उडवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:09 IST2021-11-30T13:59:41+5:302021-11-30T14:09:52+5:30
Accidental death of groom's brother on wedding day : वरातीत सामील झालेल्या वधूच्या भावासह ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अलीगढ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर लग्न पुढे ढकलण्यात आले.

दुःखद! लग्नादिवशीच वराच्या भावाचा अपघाती मृत्यू; वरातींना भरधाव कारने उडवले
अलीगढ - अलिगढ-मथुरा रस्त्यावर रविवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशातील अलिगडमधील इग्लास शहराजवळ एका भरधाव येणाऱ्या कारने वरातींना उडवले. या अपघातात वराचा मोठा भाऊ आणि घोडी जागीच ठार झाली आहे. त्याचवेळी वरातीत सामील झालेल्या वधूच्या भावासह ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अलीगढ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर लग्न पुढे ढकलण्यात आले.
ठाणे गोंडा भागातील माजरा देव नागला येथील शालूचा विवाह हातरस येथील नागला गरीबा गावातील रोहितश उर्फ रोहित याच्याशी निश्चित झाला होता. रविवारी अलीगड रोडवर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये लग्न होते. रात्री जेवण करून वरात निघाली होती. रात्री दहाच्या सुमारास अलिगड-मथुरा रस्त्यावर अलिगढ बाजूकडून येणाऱ्या एका कारने वरातींना उडवले. या घटनेनंतर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात वराचा भाऊ धरमवीर सिंग याचा जागीच मृत्यू झाला. बग्गीला असलेला घोडीचाही जागीच मृत्यू झाला.
त्याचवेळी वधूचा भाऊ दीपक, कालू उर्फ जगदीश, नागेश, धरमपाल सिंग, मनीष यांच्यासह अन्य एक नातेवाईक गंभीर जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोतवालीचे प्रभारी निरीक्षक रिपुदम सिंह यांनी सांगितले की, मृताचा भाऊ राकेश कुमार याने या घटनेसंदर्भात अज्ञात कारचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहे.