शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:31 IST

पतीची हत्या केल्यावर पत्नीने असं काही नाटक केलं की पोलिसांनाही ते खरंच वाटलं. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या हत्येप्रकरणी दोन निष्पाप लोकांना जेलमध्ये पाठवलं.

कानपूरमधून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पतीची हत्या केल्यावर पत्नीने असं काही नाटक केलं की पोलिसांनाही ते खरंच वाटलं. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या हत्येप्रकरणी दोन निष्पाप लोकांना जेलमध्ये पाठवलं. मात्र ७ दिवसांच्या फॉरेन्सिक तपासणी आणि पोलीस तपासानंतर, जे सत्य समोर आलं त्याने सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरली. 

पत्नीने पतीला मारहाण करून हत्या केल्याचं उघड झालं. कारण तिचं तिच्या भाच्यावर प्रेम होतं. तिला भाच्यासोबतच राहायचं होतं. पतीच्या हत्येनंतर पत्नीने शेजारी राहणाऱ्या एका मुलावर आणि त्याच्या वडिलांवर आरोप करत खूप गोंधळ घातला होता. एवढंच नाही तर महिलेच्या समर्थनार्थ गावकऱ्यांनी आणि एका पक्षाच्या सदस्यांनीही आंदोलन केलं होतं. आता पोलिसांनी पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. तसेच निष्पाप वडील आणि मुलाला जेलमधून सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

 घरात करण्यात आली हत्या

कानपूरमधील घाटमपूर येथे राहणारे ट्रॅक्टर मालक धीरेंद्रची ११ मे रोजी त्यांच्या घरात हत्या करण्यात आली. डोक्यावर एखाद्या कठीण वस्तूने वार करून ही हत्या करण्यात आली. हत्येनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, धीरेंद्रची पत्नी रीना रडू लागली आणि तिने गोंधळ घातला की तिच्या पतीची हत्या त्याच गावातील कीर्ती यादवने त्याच्या मुलासह केली आहे. या प्रकरणात रीनाने एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही घटनास्थळी बोलावलं, त्यानंतर खूप गोंधळ घातला.

शेजाऱ्यांवर केला आरोप

रीना जागीच रडत होती आणि तिचा पती धीरेंद्रचा ट्रॅक्टरमधील बिघाडावरून कीर्ती यादवशी वाद झाला होता, ज्यामुळे त्यानेच मारहाण केल्याचा आरोप करत होती. पत्नी रीनाने केलेल्या आरोपांनंतर कुटुंबीय आणि पक्षाचे सदस्यही संतापले होते आणि ते मृतदेह नेऊ देत नव्हते. शेवटी पोलिसांना कीर्ती यादव आणि त्याचा मुलगा रवी यांना जेलमध्ये पाठवावं लागलं. पण नंतर तपास केला असता पत्नीनेच बॉयफ्रेंडसाठी पतीची हत्या केल्याचं समोर आलं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस