शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:01 IST

पतीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असलेल्या एका महिलेची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पतीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असलेल्या एका महिलेची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या घटनेचा खुलासा महिलेच्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलाने केला असून, त्याने आपल्या आईची प्रियकरानेच हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, प्रियकर आणि पती दोघांचाही शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिलीभीत जिल्ह्यातील मीरा शर्मा (वय ३०) या महिलेचा मृतदेह बरेलीतील रामगंगा नगर सेक्टर-७, ब्लॉक-८ मधील एका भाड्याच्या क्वार्टरमध्ये आढळला. सकाळी खोलीचा दरवाजा बंद असल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी बिथरी चैनपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडला असता, मीराचा मृतदेह खोलीत पडलेला दिसला. तिचा चेहरा सुजलेला होता आणि शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा स्पष्ट दिसत होत्या, असे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचे आणि शरीरावर अनेक जखमा असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांनुसार, मृत्यू सुमारे २० तासांपूर्वी, म्हणजेच गुरुवारी रात्री झाला होता.

चिमुकल्या मुलाने दिला धक्कादायक जबाबघटनेच्या वेळी खोलीत मीराचा चार वर्षांचा मुलगा गोविंदाही उपस्थित होता. तो घाबरलेल्या अवस्थेत एका कोपऱ्यात बसला होता. पोलिसांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, तो सुरुवातीला घाबरला. मात्र, शेजारच्या महिलांनी त्याला समजावून सांगितल्यावर, त्याने हळूवारपणे सांगितले की, "काकांनी (आईचा प्रियकर) आईचा गळा दाबला." मुलाच्या या जबाबामुळे पोलिसांचा संशय मीराचा प्रियकर गुड्डू उर्फ आशिक याच्यावर अधिक बळावला. शेजाऱ्यांनीही रात्री त्यांच्या खोलीतून भांडणाचे आवाज येत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

मीराचे वैयक्तिक जीवन आणि संशयाच्या भोवऱ्यात पतीही!पोलिसांच्या माहितीनुसार, मीरा शर्माचे लग्न सुमारे आठ वर्षांपूर्वी पवन नावाच्या तरुणासोबत झाले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक असले तरी, नंतर दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. सुमारे एक वर्षापूर्वी हे वाद इतके विकोपाला गेले की, मीरा तिचा चार वर्षांचा मुलगा गोविंदासोबत पतीचे घर सोडून माहेरी परतली. काही काळ माहेरी राहिल्यानंतर, ती बरेलीत येऊन एक क्वार्टर भाड्याने घेऊन शाहजहानपूर येथील गुड्डू उर्फ आशिकसोबत राहू लागली. गुड्डू हा दुसऱ्या समुदायाचा असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यातही अनेकदा भांडणे होत असत.

पोलिसांच्या तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, मीराचा पती पवन देखील कधीकधी त्याच क्वार्टरमध्ये येत असे. पवन आणि मीराचे अनेकवेळा भांडण झाले होते आणि एक-दोनदा पवनने त्यांच्या मुलाला जबरदस्तीने पळवून नेले होते. मीराचा मोठा मुलगा अजूनही पवनसोबतच राहतो. यामुळे, पती पवनची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली असून, पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.

पोलिसांची पुढील कारवाईबिथरी चैनपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्र प्रकाश शुक्ला यांनी सांगितले की, सध्या गुड्डूला हत्येतील मुख्य आरोपी मानले जात आहे आणि त्याचा शोध घेतला जात आहे. त्याचा मोबाईलही बंद येत आहे. मात्र, पती पवनची भूमिकाही संशयास्पद असल्याने, पोलीस त्याचाही शोध घेत आहेत जेणेकरून त्याची चौकशी करता येईल. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे जमा करण्यात आले असून, हे प्रकरण लवकरच उघडकीस येईल, असे निरीक्षक शुक्ला यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी