शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्रामाणिकपणा! रिक्षाचालकाने प्रवाशाचे हरवलेले पैसे केले परत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 4:03 PM

एकीकडे काही मुजोर रिक्षाचालकांमुळे रिक्षाचालकांची प्रतिमा मलिन होत असताना राममिलन या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्दे राममिलन यादव असे या ४२ वर्षीय प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. प्रवासी अभिषेक साळवी हे आपली २० हजार रोकड व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरले होते.मुंबई गिरगाव येथे राहणारे अभिषेक साळवी सोमवारी आपल्या कुटुंबासह कल्याणात आले होते.

कल्याण - कल्याण येथे प्रामाणिक रिक्षाचालकाने एका प्रवाशाचे रिक्षात राहिलेली बॅग आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम परत करून माणुसकी शिल्लक असल्याचे पटवून दिले आहे. राममिलन यादव असे या ४२ वर्षीय प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. प्रवासी अभिषेक साळवी हे आपली २० हजार रोकड व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरले होते. रिक्षाचालक राममिलन यांनी साळवी यांना संपर्क करत सदर बॅग बाजारपेठ पोलीस स्थानकात दिली. एकीकडे काही मुजोर रिक्षाचालकांमुळे रिक्षाचालकांची प्रतिमा मलिन होत असताना राममिलन या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबई गिरगाव येथे राहणारे अभिषेक साळवी सोमवारी आपल्या कुटुंबासह कल्याणात आले होते. साळवी कुटुंबासह रिक्षाने प्रवास करीत असताना ते २० हजार रोकड आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरले होते. या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. मात्र, त्यांना रिक्षाचा नंबर माहित नव्हता. मात्र, सदर रिक्षाचालक राममिलन यादव याने प्रामाणिकपणा दाखवत बॅगेत असलेल्या कागदपत्रांच्या आधारे साळवी यांच्याशी संपर्क साधत त्यांनी बॅग व २० हजारांची रोकड बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा केली. धकाधकीच्या जीवनात पैशांची निकड असताना आणि हातावरील प्रपंच असून देखील रिक्षाचालक राममिलन यादव यांनी प्रामाणिकपणे सापडलेली बॅग परत केल्याने पोलीस स्टेशन येथे रिक्षाचालकाचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा खरंच कौतुकास्पद असून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसkalyanकल्याणMONEYपैसा