शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! 3 महिन्यांचं प्रेम अन् अवघ्या 20 दिवसांचा संसार; लव्ह स्टोरीचा असा झाला भयंकर शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 19:36 IST

Crime News : प्रेमविवाहानंतर पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. लग्नानंतर अवघ्या वीस दिवसांत एका तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा प्रेमविवाह झाला होता. पण 20 दिवसांतच तिच्या लव्हस्टोरीचा भयावह शेवट झाला आहे. प्रेमविवाहानंतर पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नेहा चौहान असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. तर राहुल बाथम असं आरोपी पतीचं नाव असून तो पटेल नगर हरगोविंदपुरम येथील रहिवासी आहे. नेहाची अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आरोपी राहुलशी ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर, अवघ्या काही दिवसांतच दोघांनी गावाजवळील एका मंदिरात जाऊन प्रेमविवाह केला होता. मुलीने आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हा विवाह केला होता. तिने आरोपी राहुलसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. पण लग्नानंतर सर्वकाही बदललं.

लग्नाच्या दुसऱ्या दिवसानंतरच आरोपी बेदम मारहाण करू लागला

नेहा सिटी सेंटर पटेल नगरमधील शोरूमजवळील एका खासगी कार्यालयात काम करायची. कामावर येता-जाता तिची ओळख राहुल बाथमशी झाली होती. हळूहळू दोघांची मैत्री वाढत गेली भेटी गाठी वाढल्या. 22 ऑगस्ट रोजी दोघांनीही आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन गावाजवळील एका मंदिरात जाऊन प्रेमविवाह केला. पण लग्नानंतर लगेच दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. लग्नाच्या दुसऱ्या दिवसानंतरच आरोपी राहुल तिला बेदम मारहाण करू लागला होता. 

तरुणीच्या नातेवाईकांनी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा केला दाखल

पतीला दारूचं व्यसन असल्याचंही नेहाला कळालं. 11 सप्टेंबर रोजी मृत्यूच्या आदल्या दिवशी देखील नेहा आणि राहुल यांच्यात वाद झाला होता. वादानंतर दोघं पती-पत्नी आपल्या घरात झोपले होते. 12 सप्टेंबर रोजी पती राहुल झोपेतून उठला असता, त्याच खोलीत नेहा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारत