शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भयंकर! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 14:42 IST

Crime News : आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या देवघर जिल्ह्यात किशन चौधरी याची आई ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. आईला वाचवण्यासाठी किशनने सर्वोतोपरी प्रयत्न केले. उपचारासाठी खूप खर्च देखील केला. मात्र आईला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. आईच्या उपचारासाठी पैसे खर्च केल्याने अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडे पैसेच नव्हते. 

किशनची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. आईच्या निधनाने त्याला फार मोठा धक्का बसला होता. गावकऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र त्याच्याकडे अंत्यविधीचं सामान घेण्यासाठीही पैसे नव्हते. आईच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना किशन घरात गेला आणि आतून कडी लावून घेतली. नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी त्याला बाहेर बोलावलं असता त्याने खोलीचा दरवाजा उघडला नाही आणि आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सर्वांना संशय आला. दरवाजा धक्का देऊन उघडला असता किशन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

किशनने खोलीत गळफास घेतल्याचं पाहून कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने तो खूप अत्यंत निराश झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. त्याने गळफास घेतल्याने त्याच्या पत्नीला मानसिक धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. किशनचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने घडत आहेत.  

खून का सौदागर! घरात सुरू होता रक्ताचा काळाबाजार; रुग्णांना दिलं गेलं दारुड्याचं रक्त अन्...

घरामध्ये रक्ताचा काळाबाजार सुरू असून दारुड्या व्यक्तींचं रक्त पुरवलं जात असल्याचा संतापजनक प्रकार आता उघडकीस आला आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात पोलीस आणि आरोग्य विभागाच्या टीमने रक्ताचा काळात बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी दारुड्यांचं रक्त काढून खासगी रुग्णालये आणि गरजवंतांना सप्लाय करत होती. नशा करणाऱ्या व्यक्तींचं रक्त चढवल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता. कप्तानपाडा भागात गेल्या एक वर्षांपूर्वी राजकुमार मंडल नावाच्या तरुणाने घर खरेदी केलं होतं. या घरात रक्ताचा काळाबाजार केला जात होता. स्थानिक महिलांनी दररोज येथे 10 ते 12 दारूडे आणि रिक्षा चालक रक्त देण्यासाठी येत होते. राजकुमार हे रक्त सप्लाय करत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडIndiaभारतDeathमृत्यूPoliceपोलिस