भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 8 दिवसांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' पत्नीलाच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 12:39 PM2021-10-25T12:39:18+5:302021-10-25T12:43:22+5:30

Crime News : लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने या दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्यानेच पतीने टोकाचं पाऊल उचललं आणि तिची हत्या केली.

Crime News husband kills wife before karva chauth in delhi | भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 8 दिवसांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' पत्नीलाच संपवलं

भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 8 दिवसांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' पत्नीलाच संपवलं

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसांनी पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सात जन्माचं नातं अवघ्या 8 दिवसांत तुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने या दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्यानेच पतीने टोकाचं पाऊल उचललं आणि तिची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आझाद खान असं 21 वर्षीय आरोपी पतीचं नाव असून त्याने पत्न किर्तीची हत्या केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे किर्तीसोबत प्रेमसंबंध होते. कामाच्या निमित्ताने त्यांची आधी ओळख झाली होती. त्यानंतर पुढे त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या या लग्नाला कुटुंबीयांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर त्यांनी आठ दिवसांपूर्वीच कोर्टात जाऊन लग्न केलं होतं आणि आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली होती. पण लग्नानंतर नातं बदललं. 

घरातून नेहमीच जोरजोरात भांडण्याचा यायचा आवाज

मोहम्मद आणि किर्तीमध्ये अनेक गोष्टींवरून वाद होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या घरातून नेहमीच जोरजोरात भांडण्याचा आवाज येत असल्याची माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मंडळींनी दिली आहे. हत्या झाली त्यादिवशी देखील त्यांच्यात मोठं भांडण झालं आणि किर्ती जोरात किंचाळली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी घरी आले तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि मोहम्मद घरातून गायब झाला होता. शेजाऱ्यांनी कीर्तीच्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली.

आठ दिवसांतच किर्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झालें. त्यावेळी किर्तीच्या शरीरावर वार केलेले दिसून आलं.मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांनी देखील या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. लग्नानंतर आवघ्या आठ दिवसांतच किर्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: Crime News husband kills wife before karva chauth in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.