शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

शांती आणि विकासाचे नवे युग; उत्तर बस्तर आणि अबूझमाड नक्षलमुक्त- मुख्यमंत्री विष्णुदेव साय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नक्षल निर्मूलन मोहीम ऐतिहासिक यशाकडे वाटचाल करत आहे.

रायपूर-छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी म्हटले की, उत्तर बस्तर आणि अबूझमाडचा नक्षलमुक्त प्रदेश बनणे हे सिद्ध करते की, आता बस्तर भयाचे नव्हे, तर विश्वास आणि विकासाचे प्रतीक बनले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भारत आज नक्षलवादाच्या अंताच्या उंबरठ्यावर उभा आहे.

दोन दिवसांत २५८ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

मुख्यमंत्री साय यांनी पुढे सांगितले की, मागील दोन दिवसांत २५८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, हे बंदुकीच्या नव्हे तर विश्वासाच्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. त्यांच्या मते, गेल्या २२ महिन्यांत ४७७ नक्षलवादी ठार, २११० आत्मसमर्पण आणि १७८५ अटक या आकडेवारीमुळे छत्तीसगड सरकारचा नक्षलमुक्त राज्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

३१ मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगड नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ३१ मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण छत्तीसगड नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट आता अगदी जवळ आले आहे. हे परिवर्तन राज्य सरकारच्या “नक्सलवादी आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरण २०२५” तसेच “नियद नेल्ला नार योजने”च्या यशस्वी अंमलबजावणीमुळे शक्य झाले आहे.

डबल इंजिन सरकारच्या संवेदनशील धोरणांमुळे, बस्तरमध्ये वाढणाऱ्या सुरक्षा छावण्यांमुळे आणि शासनावरील विश्वासामुळे हा बदल घडला आहे. आतापर्यंत नक्षलप्रभावित भागांत ६४ नवीन सुरक्षा कॅम्प उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे सुरक्षा तसेच विकासाची किरणे गावागावात पोहोचत आहेत.

वीर जवानांच्या शौर्याला मुख्यमंत्रींचा सलाम

मुख्यमंत्री साय यांनी सुरक्षाबलांच्या अदम्य धैर्य आणि बलिदानाला नमन करत म्हटले की त्यांच्या समर्पणामुळेच आज बस्तर भयमुक्त झाला असून शांततेच्या मार्गावर वाटचाल करत आहे. त्यांनी सांगितले की, अबूझमाड आणि उत्तर बस्तर पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहेत, तर दक्षिण बस्तरात निर्णायक लढाई सुरू आहे. “नियद नेल्ला नार” सारख्या योजनांनी बस्तरात संवाद, विकास आणि संवेदनशीलतेची नवी पायवाट घातली आहे.

सरकारचा स्पष्ट संदेश 

मुख्यमंत्री साय यांनी स्पष्ट केले की, सरकारची धोरणे अगदी स्पष्ट आहेत, हिंसेला कोणतीही जागा नाही. जे नक्षलवादी शांती आणि विकासाचा मार्ग स्वीकारतील त्यांचे स्वागत आहे; पण जे बंदूक उचलून समाजात भय निर्माण करतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन करत म्हटले की, “हिंसेचा मार्ग अंतहीन वेदना देतो; पण आत्मसमर्पण जीवनाला नवी दिशा आणि नव्या सुरुवातीची संधी देतो. आपल्या मातृभूमीच्या भविष्याकरिता आणि आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शस्त्रे खाली ठेवा आणि विकासाच्या प्रकाशात या.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर पोस्ट करून सांगितले की, छत्तीसगडमधील अबूझमाड आणि उत्तर बस्तर, जे कधी नक्षल दहशतीचे गढ होते,  आता पूर्णपणे नक्षलमुक्त घोषित झाले आहेत. हा केवळ भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा विजय नाही, तर विकास, विश्वास आणि संवेदनेची नवी कहाणी आहे. गेल्या दोन दिवसांत देशभरात २५८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, हे त्याचे मोठे उदाहरण आहे. त्यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांचे स्वागत करत त्यांना देशाच्या एकतेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhattisgarh: Naxal-Free Era Dawns in Bastar, Abujhmad; Development Focus

Web Summary : Chhattisgarh's Bastar and Abujhmad are now Naxal-free, signaling a shift towards development. Over 250 Naxals surrendered recently. The state aims to be completely Naxal-free by 2026, driven by effective policies and increased security presence, fostering trust and progress.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड