शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

तारेला चिटकून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: May 20, 2014 00:06 IST

पाथरी : मुख्य वाहिनीच्या लोंबकळत पडलेल्या तारेला चिटकून कोल्हावाडी येथील आशामती केशव भिसे (वय ३५ ) या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला.

पाथरी : मुख्य वाहिनीच्या लोंबकळत पडलेल्या तारेला चिटकून कोल्हावाडी येथील आशामती केशव भिसे (वय ३५ ) या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना १९ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. ही महिला शेतातून भूईमुगाचे वेल उपटून घरी परत येत असताना ही घटना घडली. कोल्हावाडी या गावाला आंबेगाव फिडरमधून वीज पुरवठा होतो. या फिडरहून येणारी मुख्य वाहिनी पाणीपुरवठा योजनेच्या डीपीला जोडण्यात आली आहे. मुख्य वाहिनीचे दोन खांब डीपीला जोडण्यापूर्वीच बालासाहेब शंकरराव भिसे यांच्या शेतात काही महिन्यांपासून वाकले गेले होते. यामुळे मुख्य वाहिनीच्या तारा जमिनीलगत लोंबकळत होत्या. शेतकर्‍यांनी या संदर्भात वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडे अनेक वेळा तक्रारी करुन वाकलेले खांब दुरुस्त करुन देण्याची मागणी केली होती. परंतु, वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी याकडे कानाडोळा केला. १९ मे रोजी गावातील एका शेतकर्‍याच्या शेतात भूईमुगाच्या पिकाची काढणी सुरु होती. यावेळी जवळपास १०० महिला सकाळी ६ वाजताच भूईमूग शेंगा काढण्यासाठी शेतात गेल्या. वेल उपटून या महिला गावाकडे परत येत असताना बालासाहेब भिसे यांच्या शेतातील मुख्य वाहिनीच्या वाकलेल्या खांबाच्या तारेला आशामती केशव भिसे या महिलेच्या डोक्याचा स्पर्श झाला. तारेत विद्युत प्रवाह सुरु असल्याने महिला तारेला चिटकून पडली. आजुबाजुच्या महिलांच्या लक्षात हा प्रकार आला. परंतु, मुख्य वाहिनीची तार असल्याने या प्रसंगी या महिलेस कोणी मदत करु शकले नाही. काही महिलांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, इतरांनी आरडाओरड केल्यामुळे या महिलाही अपघातातून बालंबाल बचावल्या. काही क्षणातच तारेला चिटकलेल्या आशामती यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तातडीने परभणी येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच आशामाती यांचा मृत्यू झाला होता. (वार्ताहर) अधिकार्‍यांवर कारवाई करा-वर्षा भिसे कोल्हावाडी येथील आशामती भिसे यांचा तारेला स्पर्श लागून मृत्यू झाला. या प्रकरणास वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. घटनेनंतर तब्बल सहा ते आठ तासापर्यंत कंपनीच्या अधिकारी किंवा कर्मचार्‍याने या ठिकाणी भेट दिली नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून ग्रामस्थांच्या वतीने वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचार्‍यांना या वाकलेल्या खांबाबाबत माहिती देण्यात आली होती. परंतु, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. याच लोंबकाळलेल्या तारामुळे आशामती भिसे यांचा दुदैवी मृत्यू झाला. वीज कंपनीने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन अधिकारी व कर्मचार्‍यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सरपंच वर्षाताई विठ्ठलराव भिसे यांनी केली आहे. गावाला जोडणार्‍या मुख्य वाहिनीच्या तारा लोंबकळत पडलेल्या घटनेला काही महिने झाले होते. गावचा लाईनमन, कंपनीचे शाखा अभियंता यांना अनेकवेळा ग्रामस्थांनी तोंडी कल्पना दिली होती. वीज कंपनीने मुख्य वाहिनीच्या तारा दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रसंग ओढावला गेला.