शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

शिवसैनिक आता गप्प का ? सरकारच्या आशिर्वादाने पीक विमा कंपन्यांना ४,२३४ कोटींचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 7:27 PM

राज्यात गेल्या खरीप हंगामात १ कोटी ३८ लाख पैकी केवळ १५ लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले.

ठळक मुद्देऔरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतून ३४ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला १२७ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते.

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट करून खाजगी विमा कंपन्या मालामाल केल्या. विम्याचे निकष बदलवले, उंबरठा उत्पादन कमी केल्यामुळे राज्यात गेल्या खरीप हंगामात १ कोटी ३८ लाख पैकी केवळ १५ लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले. सरकारच्या आशीर्वादाने विमा कंपन्यांना ४,२३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. या महाघोटाळ्यात वाटेकरी कोण, हे शोधण्याची गरज असून, फडणवीस सरकारमध्ये विमा कंपन्यांना जाब विचारणारी शिवसेना, शिवसैनिक आता गप्प का? असा सवाल भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस डाॅ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ते म्हणाले, खरीप २०१९ मध्ये राज्यात १ कोटी २८ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्याकरिता संपूर्ण विमा हप्त्यापोटी ४,७८८ कोटी रुपये भरण्यात आले होते. त्यावेळी ८५ लाख शेतकऱ्यांना ५,७९५ कोटी रुपयांचा पीक विमा प्राप्त झाला होता. तेव्हा विमा कंपन्या १,००७ कोटींनी तोट्यात होत्या. तरीही शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारण्यासाठी गेली होती. आता खरीप २०२० करिता उद्धव ठाकरे सरकारने विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी निकषामध्ये बदल केले. विमा कंपन्यांनी कृषी विभागासोबत हातमिळवणी करून केवळ १५ लाख शेतकऱ्यांना ९७४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई निश्चित केली. विमा कंपन्यांना ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने ४,२३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. आता शेतकऱ्यांचा कळवळा घेणारी शिवसेना शिवसैनिक गप्प का? असा बोचरा सवाल त्यांनी केला. यावेळी पीक विमाप्रश्नी खा. डॉ. भागवत कराड यांनी आंदोलनाचा इशारा दिला. आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, कल्याण गायकवाड आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद विभागातून १,४३३ कोटींचा नफाऔरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतून ३४ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, १२७ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. विमा कंपन्यांना १,४९० कोटी रुपये विमा हप्त्यापोटी कंपनीला प्राप्त झाले; परंतु औरंगाबाद विभागात ३४ लाख शेतकऱ्यांपैकी १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना ५५ कोटी ३० लाखांच्या विम्याची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली. एकट्या औरंगाबाद विभागातून १,४३३ कोटी रुपये नफा कमावल्याचा दावा बोंडे यांनी केला. हवामानावर आधारित फळबाग विमा योजनेचे सर्व बदललेले निकष रद्द करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी