शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

गावोगाव फिरणारे नेते गेले कुठे ?

By admin | Updated: November 26, 2014 01:08 IST

जालना : एक-दीड महिन्यांपूर्वीच्या निवडणुकातून गावोगाव फिरणारे, तोंड फाटेपर्यंत आश्वासन देणारे मोठ-मोठे नेते आता कुठे गेले? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.

जालना : एक-दीड महिन्यांपूर्वीच्या निवडणुकातून गावोगाव फिरणारे, तोंड फाटेपर्यंत आश्वासन देणारे मोठ-मोठे नेते आता कुठे गेले? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.जालना तालुक्यातील वखारी या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांबरोबर मंगळवारी हितगुज करतेवेळी ते बोलत होते. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे, प्रवक्त्या आ. निलम गोऱ्हे, उपनेते खा. चंद्रकांत खैरे, उपनेते रविंद्र मिर्लेकर, माजी मंत्री तथा आ.अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आ. शिवाजीराव चोथे, डॉ.हिकमतराव उढाण, माजी आ. संतोष सांबरे, जि.प.चे उपाध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ठाकरे यांनी आपण दुष्काळाचे राजकारण करण्याचा करंटेपणा करणार नाही, असे नमूद करीत विरोधकांवर बोचरी टीका केली. दीड-दोन महिन्यांपूर्वीच्या निवडणुकांमधून गावोगाव देशातले मोठ-मोठे नेते फिरत होते. तोंड फाटेपर्यंत आश्वासनांसह भुलथापा मारत होते. परंतु संकट कोसळले तेव्हा हे मोठ-मोठे नेते फोटोपर्यंत मर्यादीत राहिल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. त्यातील काहींना मराठवाड्यातील दुष्काळही माहित नसेल, असे ते म्हणाले.गेल्या निवडणुकीत लाट होती. असेलही. पण ती लाट गेली. आता राहिला कोरडेठाकपणा. कोरडेठाकपणा... या लाटेचे पाणी कुठे गेले ? असा सवालही ठाकरे यांनी केला. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे. आपणही मुंबईतून स्थितीचा आढावा घेवू शकलो असतो. मात्र तसे न करता प्रत्यक्ष दौरा करण्याचा, सर्वसामान्यांच्या दु:खात सहभागासह सांत्वनाचा, मदतीचा निश्चय केला. परंतु ज्यांना शेतीतले कळते, ते अद्यापपर्यंत आले का? असा सवालही ठाकरे यांनी केला. शेतकरी जगतोय का मरतोय, हे पाहण्याचे भानसुध्दा काहींना राहिले नसल्याची जोरदार टीका केली. शिवसेना आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल, असा विश्वास दिला. यावेळी आ. निलम गोऱ्हे, आ. संदीपान भुमरे, आ. संजय सिरसाट, आ. हर्षवर्धन जाधव, आ. दिपक केसरकर, आ. हेमंत पाटील, उपनेते लक्ष्मण वडले, उपजिल्हा प्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, तालुका प्रमुख संतोष मोहिते, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, अंकुश पाचफुले, जि.प. सदस्या सरला वाढेकर आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)४येत्या हिवाळी अधिवेशनातून दुष्काळी स्थितीचा सरकारला हेरुन जाब विचारला जाईल. दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडले जाईल, असे नमूद करीत ठाकरे यांनी दुष्काळ तर जाहीर होईलच; पीक कर्ज, वीज बील माफी, शैक्षणिक शुल्क माफीसह प्रति हेक्टरी अनुदान वगैरे धोरणात्मक निर्णय सुध्दा होतीलच, असा विश्वासही व्यक्त केला. आपण या दौऱ्यानंतर राज्यपालांची भेट घेणार असून सरकारला स्पष्ट निर्देश द्यावेत, राज्यपालांनीही दुष्काळी परिस्थतीची पाहणी करावी. मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले.गेल्या तीन वर्षांपासून मराठवाडा दुष्काळ अनुभवतो आहे. यावर्षीही स्थिती गंभीर आहे.शेतकरी पूर्णत: कोलमडला आहे. खचला आहे. परंतू संकटकाळात खचून न जाता, न रडता. याही संकटाचा सामना करतांना त्यावर मात करण्याचा संकल्प सोडला पाहिजे, आत्महत्येचा मार्ग न स्विकारता, मुलाबाळांसह कुटुंबियांचा संसार उद्ध्वस्त न करता, शेतकऱ्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. सदा-सर्वदा वाईट दिवस नसतात. एखादा दिवस निश्चितच चांगला येईल. तो आनंदाचाच असेल, असा विश्वासही व्यक्त केला.रखडलेले प्रकल्प मार्गी लावादुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करतेवेळी केवळ प्रथमोपचार न करता सरकारने मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अर्धवट अवस्थेत रखडलेले प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत. तरच दुष्काळाची तीव्रता कमी होईल, असे मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. वर्षानुवर्षांपासून रखडलेले प्रश्न दुष्काळास कारणीभूत ठरताहेत, असे ते म्हणाले. सरकारने या रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी दिला पाहिजे. मराठवाड्यात अनेक प्रकल्पांचे काम होणे अद्याप बाकी आहे. आपण केलेल्या या दौऱ्यात सर्व ठिकाणी प्रामुख्याने या बाबी दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.