शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाणपोई तहानलेल्या !

By admin | Updated: April 29, 2015 00:55 IST

संजय तिपाले/राजेश खराडे , बीड सामाजिक बांधिलकीचा कळवळा दाखवत विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळांच्या वतीने शहरात पाणपाई सुरु केल्या.

संजय तिपाले/राजेश खराडे , बीडसामाजिक बांधिलकीचा कळवळा दाखवत विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळांच्या वतीने शहरात पाणपाई सुरु केल्या. मात्र, पाण्याअभावी काही पाणपोई कशा तहानलेल्या आहेत? हे वास्तव ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमधून मंगळवारी पुढे आले. एकीकडे एप्रिल महिन्यात उन्हाने जोर धरल्यामुळे जीवाची काहिली होतेयं दुसरीकडे मात्र काही पाणपोईवर ‘एप्रिल फुल’ चा अनुभव येत आहे. मोठ्या आशेने पाणपोयांकडे वळलेली पाऊले निराश होऊन रिकाम्या हाताने परत येतात. त्यामुळे सामाजिक जाणिवांचा झरा देखील केवळ देखाव्यापुरताच उरला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाणी हे जीवन आहे... असा सूर आळवत शहरभर पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. मात्र, त्यात दररोज पाणी भरण्याकडे, साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. काही ठिकाणी रांजणे कोरडीठाक आढळली तर काही भागांतील पाणपोर्ईना झाकण नसल्याचे पहावयास मिळाले. धावत्या युगात तहानलेल्या वाटसरुंना पाणी पाजण्याची माणुसकी दाखवली जाते हे तसे स्वागतार्हच;पण काही पाणपोई केवळ शोभेचे बाहुले बनल्या आहेत. ‘लोकमत’ने शहरातील १५ पाणपोयांना भेटी दिल्या, त्यापैकी पाच पाणपाईंमध्ये थेंबभर पाणीही नव्हते. उर्वरित दहा ठिकाणी मात्र, पाणपोईंवर नागरिकांची उडी पडल्याचे चित्र दिसून आले.सव्वाशे जारचा माणुसकीधर्मबीड बसस्थानकात चार मित्रांनी मिळून उभारलेली पाणपोई हजारो प्रवाशांची तहान भागवत आहे. या पाणपोईवर दररोज सव्वाशे जारद्वारे थंड पाणी उपलब्ध करुन दिले जाते. पाण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केल्यावर गोंधळ, गडबड उडू नये, यासाठी एका वृद्धेला नेमले आहे. तेथे पाणी पिण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली होती. तेथे लावलेल्या बॅनरवर ना कोणाचे नाव आहे ना मोबाईल क्रमांक़ आजीबार्इंना कोणाची पाणपाई आहे ? असे विचारले तेंव्हा नावाचं काय करायचयं? असे म्हणत त्यांनी एक मोबाईल क्रमांक दिला. त्यावर संपर्क केला असता ‘कृपया आमचे नाव छापू नका, चार मित्रांनी मिळून हा उपक्रम आम्ही सुरु केलायं, प्रसिद्धी नको’ असे म्हणत त्यांनी नाव सांगण्याचेही टाळले.सुभाषरोडवरील पाणपोईलाही घरघर सुभाषरोडवरील दत्त मंदिर परिसरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे असलेल्या पाणपोईलाही कोरड पडलेली दिसून आली. वर्दळीच्या या रस्त्यावर पाण्यासाठी वाटसरु रांजणात डोकावून पाहायचे;पण पाण्याअभावी त्यांचा हिरमोड होत होता.जलकुंभ शोभेचे बाहुलेबसस्थानकात सामाजिक संघटनेच्या वतीने उभारलेला जलकुंभ केवळ शोभेचे बाहुले बनला आहे. या जलकुंभात थेंबभर पाणीही टाकले जात नाही. जलकुंभाचा वापर जाहिरातींचे पॉम्पलेट चिकटविण्यासाठीच केला जात आहे.काय सांगतो नियम?पाणपोई उभारताना संबंधितांनी जिल्हा प्रशासनाला कळविणे अपेक्षित आहे. पाणपोईत अशुद्ध पाणी राहू नये, यासाठी एक सेवक नेमला पाहिजे. पाणपोईसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस ठाण्याला माहिती देणे अनिवार्य आहे, असे नगरपालिकेतील पाणीपुरवठा अभियंता एम. एस. वाघ यांनी सांगितले. पाणपोर्इंमध्ये पाणी टाकण्याची जबाबदारी संबंधितांची आहे, पालिकेची नाही असा खुलासाही त्यांनी केला.पाणपोर्इंचे ‘फोटोसेशन’पाणपोई सुरु करणाऱ्यांनी दररोज रांजणात पाणी उपलब्ध करणे, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, उठसूठ पाणपोई सुरु करायची अन् फोटो काढून प्रसिद्धी करायची ... असा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. पाणपोई कोरडीठाक असेल तर गाजावाजा काय कामाचा? अस सवाल उपस्थित केला जात आहे.पाणपोईचा बदलता ‘ट्रेंड’नागरिकांना स्वच्छ व थंडगार पाणी देण्याच्या उद्देशाने शहरातील व्यापारी वर्ग सरसावला आहे. पुर्वी जागोजागी माठ, रांजण उभारून त्यामध्ये पाणी साठवले जात होते. आता जमाना जारचा आहे. खर्चिक का असेना मात्र ताहानलेल्या वाटसरुला थंड पाणी मिळू लागले आहे. जिल्हा रुग्णालयात विकतचे पाणीशहरात सर्वच भागांत पाणपोई आहेत. मात्र, जिल्हारुग्णालय परिसरात एकही पाणपोई नसल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना विकतच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. रुग्णालय परिसराकडे संघटना, राजकीय पक्ष यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.येथे दुरवस्था तर येथे ‘अपडेट’शहरातील पंधरा पाणपोर्इंची स्टींग दरम्यान पाहणी केली असता बसस्थानक परिसरातील जनाधार प्रतिष्ठान, बसस्थानकातील जलकुंभ, मोंढा रोडवरील युवाशक्ती मित्रमंडळ व कृषी व्यापार संघाचे तर सुभाषरोडवरील दत्तमंदिर येथील शिवसेनेच्यावतीने उभारण्यात आलेल्या पाणपोईची मोठी दुरवस्था असल्याचे दिसून आले. दुसरेकडे व्यापाऱ्यांनी व वैयक्तिकरित्या उभारण्यात आलेल्या ‘अपडेट’ पाणपोई पहावयास मिळाल्या. बसस्थानक परिसरातील देवगावकर जल या जारमधून स्वच्छ व थंडपाणपोई सुरू करण्यात आली आहे. तसेच संतश्रेष्ठ माऊली प्रतिष्ठान अंबिका चौक, नगरपालिके शेजारील अल-इमदाद पाणपोई, तर राजुरी वेस येथील जैन किराणाच्यावतीने पाणीपोई उत्तमरित्या उभारण्यात आली आहे.