शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पाणी पेटणार! वरच्या धरणातून जायकवाडीत २० टीएमसी पाणी सोडण्याची मागणी

By विकास राऊत | Updated: October 7, 2023 15:36 IST

मराठवाड्यात कमी पाऊस झाल्याने किसान सभेची मागणी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाचा मोठा खंड असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. जायकवाडीत ५० टक्क्यांपेक्षा कमी तर माजलगाव प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार नाही. वरच्या बाजूच्या मोठ्या धरणात सरासरी ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. जायकवाडी व माजलगाव प्रकल्पासाठी वरच्या धरणातून पाणी साेडावे. या मागणीसाठी १२ ऑक्टोबरपासून किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

परभणी जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पाचे लाभक्षेत्र पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यात आणि माजलगाव प्रकल्पाचे लाभक्षेत्र सोनपेठ गंगाखेड तालुक्यात अस्तित्वात आहे आणि वरील तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान आहे. जायकवाडी प्रकल्प कायमचा मोडीत काढण्याच्या हेतूने जायकवाडी प्रकल्प कर्मचारी संख्या कमी केली आहे. कालवे दुरुस्तीचा प्रस्ताव अद्याप तयारदेखील करण्यात आलेला नाही. मराठवाड्याला ४७ हजार कोटींचा निधी दिल्याच्या वल्गना करताना जायकवाडी प्रकल्पाचे व माजलगाव प्रकल्पाचे कालवे दुरुस्तीसाठी एका रुपयाचीही शासनाने तरतूद केली नाही. २०८ किमी पैठण डावा कालवा अत्यंत कमजोर झालेला असून सदर कालव्याची स्थापित वहन क्षमता साखळी किमी १२२ वरील सीआर येथे ३३०० क्युसेक क्षमता असताना केवळ ‪८०० ते ९०० क्युसेक क्षमतेने चालविला जातो.

किसान सभेच्या मागण्यासमन्यायी पाणीवाटपाबाबत न्यायालयीन तरतुदी व मजनिप्रा कायद्यानुसार जायकवाडी प्रकल्पासाठी २० टीएमसी व माजलगाव प्रकल्पासाठी ५ टीएमसी पाणी वरच्या धरणातून सोडावे.जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पातील लाभक्षेत्राच्या संपूर्ण क्षेत्रासाठी रब्बी व उन्हाळी १२ पाणी पाळ्या उपलब्ध करा. जायकवाडी प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी प्रलंबित २५०० कोटी रुपयांचा निधी तातडीने द्या. या व इतर मागण्यांसाठी किसान सभेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसWaterपाणीAurangabadऔरंगाबाद