शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

पाणी पेटणार! वरच्या धरणातून जायकवाडीत २० टीएमसी पाणी सोडण्याची मागणी

By विकास राऊत | Updated: October 7, 2023 15:36 IST

मराठवाड्यात कमी पाऊस झाल्याने किसान सभेची मागणी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाचा मोठा खंड असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. जायकवाडीत ५० टक्क्यांपेक्षा कमी तर माजलगाव प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार नाही. वरच्या बाजूच्या मोठ्या धरणात सरासरी ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. जायकवाडी व माजलगाव प्रकल्पासाठी वरच्या धरणातून पाणी साेडावे. या मागणीसाठी १२ ऑक्टोबरपासून किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

परभणी जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पाचे लाभक्षेत्र पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यात आणि माजलगाव प्रकल्पाचे लाभक्षेत्र सोनपेठ गंगाखेड तालुक्यात अस्तित्वात आहे आणि वरील तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान आहे. जायकवाडी प्रकल्प कायमचा मोडीत काढण्याच्या हेतूने जायकवाडी प्रकल्प कर्मचारी संख्या कमी केली आहे. कालवे दुरुस्तीचा प्रस्ताव अद्याप तयारदेखील करण्यात आलेला नाही. मराठवाड्याला ४७ हजार कोटींचा निधी दिल्याच्या वल्गना करताना जायकवाडी प्रकल्पाचे व माजलगाव प्रकल्पाचे कालवे दुरुस्तीसाठी एका रुपयाचीही शासनाने तरतूद केली नाही. २०८ किमी पैठण डावा कालवा अत्यंत कमजोर झालेला असून सदर कालव्याची स्थापित वहन क्षमता साखळी किमी १२२ वरील सीआर येथे ३३०० क्युसेक क्षमता असताना केवळ ‪८०० ते ९०० क्युसेक क्षमतेने चालविला जातो.

किसान सभेच्या मागण्यासमन्यायी पाणीवाटपाबाबत न्यायालयीन तरतुदी व मजनिप्रा कायद्यानुसार जायकवाडी प्रकल्पासाठी २० टीएमसी व माजलगाव प्रकल्पासाठी ५ टीएमसी पाणी वरच्या धरणातून सोडावे.जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पातील लाभक्षेत्राच्या संपूर्ण क्षेत्रासाठी रब्बी व उन्हाळी १२ पाणी पाळ्या उपलब्ध करा. जायकवाडी प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी प्रलंबित २५०० कोटी रुपयांचा निधी तातडीने द्या. या व इतर मागण्यांसाठी किसान सभेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसWaterपाणीAurangabadऔरंगाबाद