शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पेटणार! वरच्या धरणातून जायकवाडीत २० टीएमसी पाणी सोडण्याची मागणी

By विकास राऊत | Updated: October 7, 2023 15:36 IST

मराठवाड्यात कमी पाऊस झाल्याने किसान सभेची मागणी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाचा मोठा खंड असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. जायकवाडीत ५० टक्क्यांपेक्षा कमी तर माजलगाव प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार नाही. वरच्या बाजूच्या मोठ्या धरणात सरासरी ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. जायकवाडी व माजलगाव प्रकल्पासाठी वरच्या धरणातून पाणी साेडावे. या मागणीसाठी १२ ऑक्टोबरपासून किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

परभणी जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पाचे लाभक्षेत्र पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यात आणि माजलगाव प्रकल्पाचे लाभक्षेत्र सोनपेठ गंगाखेड तालुक्यात अस्तित्वात आहे आणि वरील तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान आहे. जायकवाडी प्रकल्प कायमचा मोडीत काढण्याच्या हेतूने जायकवाडी प्रकल्प कर्मचारी संख्या कमी केली आहे. कालवे दुरुस्तीचा प्रस्ताव अद्याप तयारदेखील करण्यात आलेला नाही. मराठवाड्याला ४७ हजार कोटींचा निधी दिल्याच्या वल्गना करताना जायकवाडी प्रकल्पाचे व माजलगाव प्रकल्पाचे कालवे दुरुस्तीसाठी एका रुपयाचीही शासनाने तरतूद केली नाही. २०८ किमी पैठण डावा कालवा अत्यंत कमजोर झालेला असून सदर कालव्याची स्थापित वहन क्षमता साखळी किमी १२२ वरील सीआर येथे ३३०० क्युसेक क्षमता असताना केवळ ‪८०० ते ९०० क्युसेक क्षमतेने चालविला जातो.

किसान सभेच्या मागण्यासमन्यायी पाणीवाटपाबाबत न्यायालयीन तरतुदी व मजनिप्रा कायद्यानुसार जायकवाडी प्रकल्पासाठी २० टीएमसी व माजलगाव प्रकल्पासाठी ५ टीएमसी पाणी वरच्या धरणातून सोडावे.जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पातील लाभक्षेत्राच्या संपूर्ण क्षेत्रासाठी रब्बी व उन्हाळी १२ पाणी पाळ्या उपलब्ध करा. जायकवाडी प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी प्रलंबित २५०० कोटी रुपयांचा निधी तातडीने द्या. या व इतर मागण्यांसाठी किसान सभेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसWaterपाणीAurangabadऔरंगाबाद