शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

औरंगाबाद जिल्ह्यात १,१३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 19:51 IST

...तरीही अनेक गावे तहानलेली 

ठळक मुद्देजिल्ह्यातील विहिरी आटल्या३७ पॉइंटवर भरले जातात टँकर 

औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या ७४९ गावे आणि २७० वाड्यांना १,१३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी अनेक दुर्गम भागातील तहानलेल्या वाड्या- वस्त्यांपर्यंत टँकर पोहोचलेलेच नाहीत. दरम्यान, पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५६१ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, अनेक विहिरी आटत चालल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ‘एमआयडीसीं’चे जलशुद्धीकरण केंद्र, काही ठिकाणी धरणातून पाणी घेतले जात आहे.

जिल्ह्यात यंदा पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. माणसांबरोबर जनावरांनाही पाणी देण्याचे शासनाचे आदेश आहेत. जिल्ह्यात असलेले अनेक जलस्रोत आटत चालले आहेत. अधिग्रहित केलेल्या अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध करण्यासाठी सरकारी यंत्रणा हतबल झाली आहे. त्यामुळे सध्या तरी ‘एमआयडीसी’च्या पाण्यावरच टँकरची मदार आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजगेट जलशुद्धीकरण केंद्रात टँकर भरण्यासाठी एक पॉइंट होता. यंदा तेथे जास्तीचे तीन पॉइंट वाढविण्यात आले आहेत. सध्या तेथील ४ पॉइंटवरून टँकर भरले जातात. ‘बीकेटी’ जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी २ पॉइंटवर टँकर भरले जात आहेत. साजापूर जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी अगोदर २ पॉइंटवरून टँकर भरले जात होते. याठिकाणी आणखी १ पॉइंट वाढविण्यात आला आहे.

शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी २ पॉइंट होते, तेथे जास्तीचे आणखी ४ पॉइंट वाढविण्यात आले आहेत. ‘डीएमआयसी’च्या खोडेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या ४ पॉइंटवर टँकर भरले जात आहेत.मुदलवाडी जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी टँकर भरण्यासाठी २ पॉइंट होते, तेथे आणखी एक पॉइंट वाढविण्यात आला आहे. सिल्लोड तालुक्यातील केळगाव धरणात नव्याने ४ पॉइंट तयार करण्यात आले  आहेत. जांभई धरणातील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी नव्याने ३ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. अंभई जलशुद्धीकरण केंद्रात १ पॉइंट तयार करण्यात आला आहे. 

वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी नाशिक जिल्ह्यातील गळमोडी धरणातून टँकर भरले जातात. तेथे ४ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी नव्याने २ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. याशिवाय सांजूळ धरणात एक पॉइंट तयार करण्यात आला आहे. अशा एकूण ३७ पॉइंटवरून टँकर भरून पाणीपुरवठा केला जात आहे. 

तालुकानिहाय तहानलेल्या गावांची स्थितीतालुका    गावे    वाड्या    टँकरऔरंगाबाद     १३७    ४४    १९५फुलंब्री    ६८    ०४    ११४पैठण    ९६    ३१    १३१गंगापूर    १४१    ४१    १७९वैजापूर    १२५    १७    १८५खुलताबाद    ३१    १५    ४६सिल्लोड    ९४    ९०    १८७कन्नड    ५१    २९    ८४    सोयगाव    ०६    ००    १०एकूण    ७४९    २७०    ११३१ 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबादWaterपाणी