शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

औरंगाबाद जिल्ह्यात १,१३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 19:51 IST

...तरीही अनेक गावे तहानलेली 

ठळक मुद्देजिल्ह्यातील विहिरी आटल्या३७ पॉइंटवर भरले जातात टँकर 

औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या ७४९ गावे आणि २७० वाड्यांना १,१३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी अनेक दुर्गम भागातील तहानलेल्या वाड्या- वस्त्यांपर्यंत टँकर पोहोचलेलेच नाहीत. दरम्यान, पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५६१ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, अनेक विहिरी आटत चालल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ‘एमआयडीसीं’चे जलशुद्धीकरण केंद्र, काही ठिकाणी धरणातून पाणी घेतले जात आहे.

जिल्ह्यात यंदा पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. माणसांबरोबर जनावरांनाही पाणी देण्याचे शासनाचे आदेश आहेत. जिल्ह्यात असलेले अनेक जलस्रोत आटत चालले आहेत. अधिग्रहित केलेल्या अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध करण्यासाठी सरकारी यंत्रणा हतबल झाली आहे. त्यामुळे सध्या तरी ‘एमआयडीसी’च्या पाण्यावरच टँकरची मदार आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजगेट जलशुद्धीकरण केंद्रात टँकर भरण्यासाठी एक पॉइंट होता. यंदा तेथे जास्तीचे तीन पॉइंट वाढविण्यात आले आहेत. सध्या तेथील ४ पॉइंटवरून टँकर भरले जातात. ‘बीकेटी’ जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी २ पॉइंटवर टँकर भरले जात आहेत. साजापूर जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी अगोदर २ पॉइंटवरून टँकर भरले जात होते. याठिकाणी आणखी १ पॉइंट वाढविण्यात आला आहे.

शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी २ पॉइंट होते, तेथे जास्तीचे आणखी ४ पॉइंट वाढविण्यात आले आहेत. ‘डीएमआयसी’च्या खोडेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या ४ पॉइंटवर टँकर भरले जात आहेत.मुदलवाडी जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी टँकर भरण्यासाठी २ पॉइंट होते, तेथे आणखी एक पॉइंट वाढविण्यात आला आहे. सिल्लोड तालुक्यातील केळगाव धरणात नव्याने ४ पॉइंट तयार करण्यात आले  आहेत. जांभई धरणातील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी नव्याने ३ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. अंभई जलशुद्धीकरण केंद्रात १ पॉइंट तयार करण्यात आला आहे. 

वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी नाशिक जिल्ह्यातील गळमोडी धरणातून टँकर भरले जातात. तेथे ४ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी नव्याने २ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. याशिवाय सांजूळ धरणात एक पॉइंट तयार करण्यात आला आहे. अशा एकूण ३७ पॉइंटवरून टँकर भरून पाणीपुरवठा केला जात आहे. 

तालुकानिहाय तहानलेल्या गावांची स्थितीतालुका    गावे    वाड्या    टँकरऔरंगाबाद     १३७    ४४    १९५फुलंब्री    ६८    ०४    ११४पैठण    ९६    ३१    १३१गंगापूर    १४१    ४१    १७९वैजापूर    १२५    १७    १८५खुलताबाद    ३१    १५    ४६सिल्लोड    ९४    ९०    १८७कन्नड    ५१    २९    ८४    सोयगाव    ०६    ००    १०एकूण    ७४९    २७०    ११३१ 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबादWaterपाणी