शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

औरंगाबाद जिल्ह्यात १,१३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 19:51 IST

...तरीही अनेक गावे तहानलेली 

ठळक मुद्देजिल्ह्यातील विहिरी आटल्या३७ पॉइंटवर भरले जातात टँकर 

औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या ७४९ गावे आणि २७० वाड्यांना १,१३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी अनेक दुर्गम भागातील तहानलेल्या वाड्या- वस्त्यांपर्यंत टँकर पोहोचलेलेच नाहीत. दरम्यान, पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५६१ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, अनेक विहिरी आटत चालल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ‘एमआयडीसीं’चे जलशुद्धीकरण केंद्र, काही ठिकाणी धरणातून पाणी घेतले जात आहे.

जिल्ह्यात यंदा पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. माणसांबरोबर जनावरांनाही पाणी देण्याचे शासनाचे आदेश आहेत. जिल्ह्यात असलेले अनेक जलस्रोत आटत चालले आहेत. अधिग्रहित केलेल्या अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध करण्यासाठी सरकारी यंत्रणा हतबल झाली आहे. त्यामुळे सध्या तरी ‘एमआयडीसी’च्या पाण्यावरच टँकरची मदार आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजगेट जलशुद्धीकरण केंद्रात टँकर भरण्यासाठी एक पॉइंट होता. यंदा तेथे जास्तीचे तीन पॉइंट वाढविण्यात आले आहेत. सध्या तेथील ४ पॉइंटवरून टँकर भरले जातात. ‘बीकेटी’ जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी २ पॉइंटवर टँकर भरले जात आहेत. साजापूर जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी अगोदर २ पॉइंटवरून टँकर भरले जात होते. याठिकाणी आणखी १ पॉइंट वाढविण्यात आला आहे.

शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी २ पॉइंट होते, तेथे जास्तीचे आणखी ४ पॉइंट वाढविण्यात आले आहेत. ‘डीएमआयसी’च्या खोडेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या ४ पॉइंटवर टँकर भरले जात आहेत.मुदलवाडी जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी टँकर भरण्यासाठी २ पॉइंट होते, तेथे आणखी एक पॉइंट वाढविण्यात आला आहे. सिल्लोड तालुक्यातील केळगाव धरणात नव्याने ४ पॉइंट तयार करण्यात आले  आहेत. जांभई धरणातील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी नव्याने ३ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. अंभई जलशुद्धीकरण केंद्रात १ पॉइंट तयार करण्यात आला आहे. 

वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी नाशिक जिल्ह्यातील गळमोडी धरणातून टँकर भरले जातात. तेथे ४ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी नव्याने २ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. याशिवाय सांजूळ धरणात एक पॉइंट तयार करण्यात आला आहे. अशा एकूण ३७ पॉइंटवरून टँकर भरून पाणीपुरवठा केला जात आहे. 

तालुकानिहाय तहानलेल्या गावांची स्थितीतालुका    गावे    वाड्या    टँकरऔरंगाबाद     १३७    ४४    १९५फुलंब्री    ६८    ०४    ११४पैठण    ९६    ३१    १३१गंगापूर    १४१    ४१    १७९वैजापूर    १२५    १७    १८५खुलताबाद    ३१    १५    ४६सिल्लोड    ९४    ९०    १८७कन्नड    ५१    २९    ८४    सोयगाव    ०६    ००    १०एकूण    ७४९    २७०    ११३१ 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबादWaterपाणी