शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग आरक्षण सोडत २२ डिसेंबरपर्यंत होणार

By admin | Updated: October 28, 2014 01:02 IST

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल- २०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, प्रभाग रचनेच्या कामाला गती आली आहे.

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल- २०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, प्रभाग रचनेच्या कामाला गती आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता मनपा निवडणुकीचे वेध राजकीय वर्तुळाला लागले आहेत. शहराची बदललेली राजकीय स्थिती आणि एमआयएमचे आगमन यामुळे पालिकेवर पकड मजबूत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आराखडे बांधण्यास सुरुवात केली आहे. १९८८ पासून मनपावर सेना-भाजपाचे वर्चस्व आहे. वॉर्ड रचनेवरच राजकीय समीकरणांच्या गोळाबेरजेचा पाया असतो. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. २०१४ च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना व आरक्षण करण्याची मागणी होत आहे. तसे झाल्यास १४० वॉर्डांचे ७० प्रभाग होऊ शकतात. येत्या २० दिवसांमध्ये नकाशांचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. २० ते २२ डिसेंबरपर्यंत नवीन होणाऱ्या प्रभागांची आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुका प्रभागनिहाय होणार असून, त्याला शिवसेना-भाजपा युती विरोध करणार आहे. जुन्या वॉर्डनिहाय पद्धतीनेच रचना व्हावी. यासाठी शिवसेना पुढाकार घेणार असल्याचे माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी सोमवारी स्पष्ट केले. शासन गठीत झाल्यानंतर याप्रकरणी मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ४एका वॉर्डात एकच नगरसेवक असला पाहिजे. प्रभागामुळे एकच मतदार दोनवेळा मतदान करील. हे घटनेत बसत नाही. तसेच एकाच प्रभागातून वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आल्यास त्याचा परिणाम विकासकामांवरही होऊ शकतो. त्यामुळे प्रभाग पद्धतीला शिवसेना विरोध करणार आहे. मुंबईला वॉर्ड पद्धत आहे. त्याप्रमाणे येथेही वॉर्ड पद्धत ठेवण्यासाठी पक्षाची मागणी आहे.पालिका प्रशासन सध्या विद्यमान वॉर्डांचे नकाशे तयार करीत आहे. ते काम झाल्यावर प्रभाग पद्धतीवर आक्षेप घेण्यासाठी तयार करणार असल्याचे जैस्वाल म्हणाले. १२० वॉर्ड होतील असा २०११ च्या जनगणनेनुसार अंदाज आहे. सध्या लोकसंख्या वाढली आहे. १४० वॉर्ड झाले पाहिजेत. वाढीव लोकसंख्येनुसार ओपन, ओबीसी, महिला, एस.सी.,एस.टी. अशी आरक्षणाची सोडत झाली पाहिजे. ही सोडत जुन्या पद्धतीनेच झाली पाहिजे असा शिवसेनेचा आग्रह राहील. त्यासाठी केंद्र, राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येईल.