शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ मंडळच झाले अनाथ!

By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद अल्पसंख्याक समाजातील गोर-गरीब नागरिक, अनाथ मुले, विधवा महिलांच्या पालन-पोषणासाठी वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आले

मुजीब देवणीकर , औरंगाबादअल्पसंख्याक समाजातील गोर-गरीब नागरिक, अनाथ मुले, विधवा महिलांच्या पालन-पोषणासाठी वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आले. राज्यात ९३ हजार एकर जागेची मालकी असलेल्या वक्फ मंडळाला राज्यात विभागीय कार्यालये स्थापन करण्यासाठी जागाच मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र वक्फ मंडळाचे मुख्य कार्यालय औरंगाबादेत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या नागरिकांना, वक्फ प्रॉपर्टीशी संबंधित पाठपुरावा करण्यासाठी नागरिकांना थेट औरंगाबादेत यावे लागत होते. राज्यातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दोन वर्षांपूर्वी शासनाने विभागीय कार्यालये सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयामुळे वक्फ मंडळाचे काम अधिक गतीने होईल, नागरिकांची कामे लवकर होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. राज्यात वक्फ मंडळाच्या २३ हजार ५६६ मालमत्ता आहेत. या मालमत्तांची देखरेख करण्याची जबाबदारी मंडळावर आहे. मंडळाकडे फक्त ५४ कर्मचारी असल्याने एवढा मोठा व्याप सांभाळणे अवघड होऊन बसले आहे. वक्फच्या बहुतांश मालमत्तावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे पक्की असून मंडळाला ती हटविणे अवघड होऊन बसले आहे. अनेक मालमत्तांसंदर्भात न्यायालयांमध्ये वादही सुरू आहेत. ४मागीलवर्षी नागपूर येथे तत्कालीन अल्पसंख्याक विकासमंत्री नसीम खान यांनी वक्फ कार्यालयाचे उद्घाटनही केले. याशिवाय अमरावती, पुणे, मुंबई, नाशिक आदी शहरांमध्ये कार्यालये सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले होते.४यासंदर्भात वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद एजाज हुसैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. ४या कार्यालयांना कायमस्वरूपी जागा शोधण्यात येत आहे. लवकरात लवकर जागाही मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.