शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अंजना-पळशी प्रकल्पाखालील गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:02 IST

नाचनवेल : पिशोर येथील अंजना-पळशी धरणाच्या लोकार्पणाला वीस वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर लाभक्षेत्रातील गावे आजही तहानलेलीच आहेत. यंदा कडक ...

नाचनवेल : पिशोर येथील अंजना-पळशी धरणाच्या लोकार्पणाला वीस वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर लाभक्षेत्रातील गावे आजही तहानलेलीच आहेत. यंदा कडक उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेता या लाभक्षेत्रातील गावांसाठी पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अंजना नदीवर पिशोर येथे बांधण्यात आलेल्या या धरणाखालील सुमारे १५ किमीपर्यंतचा परिसर हा जलसिंचन क्षेत्र (कमांडिंग एरिया) म्हणून गणला जातो. यामुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहारात अधिकचे मुद्रांक शुल्क आकारले जाते. पिशोर धरणाच्या डाव्या कालव्यावर नादरपूर, मोहाडी, आमदाबाद, नाचनवेल व आडगाव शिवारातील शेतीक्षेत्र आहे. धरणाच्या निर्मितीपासून या कालव्यात केवळ एक ते दोन वेळा आवर्तने सोडण्यात आली. आजघडीला कालव्यात अनेक ठिकाणी झाडे वाढली असून, कालव्यावरील पूल मोडकळीस आले आहेत. धरण लाभक्षेत्रात असल्याने या गावांचा समावेश पोखरा योजनेत झालेला नाही व शेतकऱ्यांना ठिबक, तुषार सिंचनासाठी असलेल्या वाढीव अनुदानापासूनही वंचित राहावे लागत आहे. येत्या उन्हाळ्यात टँकरवर खर्च करण्यापेक्षा अंजना पळशी प्रकल्पातून तत्काळ पाण्याचे आवर्तन सोडून संभाव्य पाणीटंचाईला प्रतिबंध करण्याची मागणी सर्व ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

उजवा कालवा मोहऱ्यापर्यंत वाढविण्याची मागणी

उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात भिलदरी, शफियाबाद, नादरपूर, पिंपरखेड, जवखेडा बु., जवखेडा खु., सारोळा, आमदाबाद, नाचनवेल, कोपरवेल, मोहरा व टाकळी इ. गावे समाविष्ट आहेत. परंतु या कालव्याचे पुढे कामच झालेले नाही. लवकरात लवकर सर्वेक्षण व जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून कालवा मोहऱ्यापर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोट

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी नाचनवेल परिसर हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जात होता. परंतु पिशोर धरणाच्या उभारणीनंतर मात्र धरणाखाली नदीपात्रातील पाण्याची आवक घटत जाऊन कोरडवाहू पिकांवर विसंबून राहण्याची वेळ आली आहे. धरण उशाशी असूनही ही गावे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असतात. या भागाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनदरबारी निवेदने दिली आहेत.

-विठ्ठलराव थोरात, माजी बांधकाम सभापती (जि.प. औरंगाबाद)

फोटो कॅप्शन - अंजना-पळशी धरणात सध्या मुबलक जलसाठा असून, तांत्रिक बाबींची पूर्तता करून विसर्ग करण्याची मागणी होत आहे.

050421\20210405_104841_1.jpg

अंजना-पळशी धरणात सध्या मुबलक जलसाठा असून तांत्रिक बाबींची पूर्तता करून विसर्ग  करण्याची मागणी होत आहे.