शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

अंजना-पळशी प्रकल्पाखालील गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:02 IST

नाचनवेल : पिशोर येथील अंजना-पळशी धरणाच्या लोकार्पणाला वीस वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर लाभक्षेत्रातील गावे आजही तहानलेलीच आहेत. यंदा कडक ...

नाचनवेल : पिशोर येथील अंजना-पळशी धरणाच्या लोकार्पणाला वीस वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर लाभक्षेत्रातील गावे आजही तहानलेलीच आहेत. यंदा कडक उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेता या लाभक्षेत्रातील गावांसाठी पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अंजना नदीवर पिशोर येथे बांधण्यात आलेल्या या धरणाखालील सुमारे १५ किमीपर्यंतचा परिसर हा जलसिंचन क्षेत्र (कमांडिंग एरिया) म्हणून गणला जातो. यामुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहारात अधिकचे मुद्रांक शुल्क आकारले जाते. पिशोर धरणाच्या डाव्या कालव्यावर नादरपूर, मोहाडी, आमदाबाद, नाचनवेल व आडगाव शिवारातील शेतीक्षेत्र आहे. धरणाच्या निर्मितीपासून या कालव्यात केवळ एक ते दोन वेळा आवर्तने सोडण्यात आली. आजघडीला कालव्यात अनेक ठिकाणी झाडे वाढली असून, कालव्यावरील पूल मोडकळीस आले आहेत. धरण लाभक्षेत्रात असल्याने या गावांचा समावेश पोखरा योजनेत झालेला नाही व शेतकऱ्यांना ठिबक, तुषार सिंचनासाठी असलेल्या वाढीव अनुदानापासूनही वंचित राहावे लागत आहे. येत्या उन्हाळ्यात टँकरवर खर्च करण्यापेक्षा अंजना पळशी प्रकल्पातून तत्काळ पाण्याचे आवर्तन सोडून संभाव्य पाणीटंचाईला प्रतिबंध करण्याची मागणी सर्व ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

उजवा कालवा मोहऱ्यापर्यंत वाढविण्याची मागणी

उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात भिलदरी, शफियाबाद, नादरपूर, पिंपरखेड, जवखेडा बु., जवखेडा खु., सारोळा, आमदाबाद, नाचनवेल, कोपरवेल, मोहरा व टाकळी इ. गावे समाविष्ट आहेत. परंतु या कालव्याचे पुढे कामच झालेले नाही. लवकरात लवकर सर्वेक्षण व जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून कालवा मोहऱ्यापर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोट

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी नाचनवेल परिसर हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जात होता. परंतु पिशोर धरणाच्या उभारणीनंतर मात्र धरणाखाली नदीपात्रातील पाण्याची आवक घटत जाऊन कोरडवाहू पिकांवर विसंबून राहण्याची वेळ आली आहे. धरण उशाशी असूनही ही गावे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असतात. या भागाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनदरबारी निवेदने दिली आहेत.

-विठ्ठलराव थोरात, माजी बांधकाम सभापती (जि.प. औरंगाबाद)

फोटो कॅप्शन - अंजना-पळशी धरणात सध्या मुबलक जलसाठा असून, तांत्रिक बाबींची पूर्तता करून विसर्ग करण्याची मागणी होत आहे.

050421\20210405_104841_1.jpg

अंजना-पळशी धरणात सध्या मुबलक जलसाठा असून तांत्रिक बाबींची पूर्तता करून विसर्ग  करण्याची मागणी होत आहे.