शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घाटनांदूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा

By admin | Updated: June 23, 2014 00:20 IST

घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून घाटनांदूरची ओळख आहे.

घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून घाटनांदूरची ओळख आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे सुमारे ३९ हजार लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली असून आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या उपकेंद्रांवर साळुंकवाडी, पूस, गिरवली, वरवटी, साकूड या ठिकाणी एकही आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. येथील उपकेंद्र दोन वर्षापासून बंद केले असून तब्बल एक वर्षापासून एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोग्य केंद्राचा डोलारा सुरु आहे. तरीसुध्दा येथील वैद्यकीय अधिकाऱ्याची परळी येथील नागापूर येथे बदली झाल्याने डॉक्टराविनाच येथील आरोग्य केंद्र सुरु आहे. तब्बल २८ गावातील ४१ हजार जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.घाटनांदूर येथे १८ ते २० हजाराच्या जवळपास लोकसंख्या असून तब्बल १ वर्षापासून एका डॉक्टरवर चालणारे आरोग्य केंद्र, त्यांचीही १५ दिवसापूर्वीच बदली झाल्याने बेवारस आहे. साळुंकवाडी आरोग्य उपकेंद्रावर ए.एन.एम.चे एक पद रिक्त आहे. गिरवली उपकेंद्रावर एम. पी. डब्ल्यू. कर्मचाऱ्याचे एक पद रिक्त आहे. घाटनांदूर प्रा. आ. केंद्रात शिपाई जास्त आणि आरोग्य कर्मचारी कमी असा प्रकार आहे. या ठिकाणी पाच शिपाई, चार एम. पी. डब्ल्यू., पाच ए. एन. एम. व दोन सुपरवायझर असून एन.आर.एच.एम. योजनेंतर्गत कंत्राटी पध्दतीने दोन स्टाफ नर्स, चार ए.एन.एम., एक डाटा आॅपरेटर आदी कर्मचारी कार्यरत आहेत.शासन आदेशानुसार प्रत्येक उपकेंद्रात प्रसुती होणे आवश्यक आहे. मात्र कर्मचारीच मुख्यालयी राहत नसल्याने प्रसुतीचा प्रश्नच येत नाही. घाटनांदूरच्या उपकेंद्रात रुग्ण आला की त्याला टोलवाटोलवीची उत्तरे देऊन अंबाजोगाईच्या स्वारातीत रेफर करण्यात येत असल्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. शासन नियमानुसार प्रत्येक पाच हजार लोकसंख्येला एक आरोग्य उपकेंद्र आवश्यक आहे. मात्र शासन स्वत:च आपले नियम धाब्यावर बसवत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. साळुंके यांची एक वर्षापासून जागा रिक्त आहे तर दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. सोळंके यांची बदली झाल्याने हे पद रिक्त आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेवा राम भरोसे असल्याचे दिसून आले आहे.कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. येथील आरोग्य केंद्रात औषधसाठा पुरेसा उपलब्ध नसल्याने खासगी मेडिकल वरुन रुग्णांना औषधी विकत घ्यावी लागत आहेत. याचा आर्थिक भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत आहे. येथे उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय स्थापन करावे अशी मागणी दहा वर्षापासून असतानाही याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. अंबाजोगाईचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड म्हणाले की, आमच्याकडे लेखी तक्रार नाही. तक्रार आल्यानंतर निश्चित कार्यवाही करु. ग्रामीण रुग्णालय येथे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)